ETV Bharat / bharat

चांद्रयान-२ च्या उड्डाणाची तयारी पूर्ण, इतिहास घडवण्यासाठी भारत पुन्हा सज्ज

यापूर्वी १५ जुलैला चांद्रयान-2 हे चंद्राच्या दिशेने झेपावणार होते. मात्र, अखेरच्या क्षणी रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने इस्त्रोने हे उड्डाण रद्द केले होते.

author img

By

Published : Jul 21, 2019, 11:06 AM IST

चंद्रयान-२ च्या उड्डाणाची रिहर्सल पूर्ण, इतिहास घडवण्यासाठी भारत पुन्हा सज्ज

नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) देशाच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ च्या उड्डाणाची पूर्व चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भारत पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी २२ जुलैला चंद्रयान - २ चे उड्डाण होणार आहे.

यासंदर्भात 'जीएसएलव्हीएमके३ - एम१ (GSLV MK3-M1) / चांद्रयान-२ च्या उड्डाणाची रिहर्सल पूर्ण,' असे ट्विट इस्रोने केले आहे.

यापूर्वी १५ जुलैला चांद्रयान-2 हे चंद्राच्या दिशेने झेपावणार होते. मात्र, अखेरच्या क्षणी रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने इस्त्रोने हे उड्डाण रद्द केले होते.

चांद्रयान - 2 हे भारतीय तंत्रज्ञान आहे. हे चंद्रावरील, अशा भागांचा शोध घेईल जेथे अद्याप कुणीही पाय ठेवलेला नाही. जीएसएलव्हीएमके३ - एम१ या प्रक्षेपक यानाच्या साहाय्याने चांद्रयान-२ चे ऑर्बिटर आणि लँडर पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावतील आणि नंतर चंद्राच्या कक्षेत सोडण्यात येतील. या निमित्ताने भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहाच वर्षांत 'इस्रो' चांद्रयान-२' च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.

नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) देशाच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ च्या उड्डाणाची पूर्व चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भारत पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी २२ जुलैला चंद्रयान - २ चे उड्डाण होणार आहे.

यासंदर्भात 'जीएसएलव्हीएमके३ - एम१ (GSLV MK3-M1) / चांद्रयान-२ च्या उड्डाणाची रिहर्सल पूर्ण,' असे ट्विट इस्रोने केले आहे.

यापूर्वी १५ जुलैला चांद्रयान-2 हे चंद्राच्या दिशेने झेपावणार होते. मात्र, अखेरच्या क्षणी रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड उद्भवल्याने इस्त्रोने हे उड्डाण रद्द केले होते.

चांद्रयान - 2 हे भारतीय तंत्रज्ञान आहे. हे चंद्रावरील, अशा भागांचा शोध घेईल जेथे अद्याप कुणीही पाय ठेवलेला नाही. जीएसएलव्हीएमके३ - एम१ या प्रक्षेपक यानाच्या साहाय्याने चांद्रयान-२ चे ऑर्बिटर आणि लँडर पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावतील आणि नंतर चंद्राच्या कक्षेत सोडण्यात येतील. या निमित्ताने भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहाच वर्षांत 'इस्रो' चांद्रयान-२' च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.

Intro:Body:

shirkrushna


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.