ETV Bharat / bharat

पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरुच; भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर

author img

By

Published : Oct 10, 2020, 7:16 PM IST

Updated : Oct 10, 2020, 7:35 PM IST

गेल्या वर्षींपेक्षा जास्त घुसखोरीच्या घटना यंदा रोखण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानातून घुसखोरीचा आकडा 130 च्या जवळपास होता. मात्र, यावर्षी ही आकडेवारी 30 ने कमी झाली आहे, अशी माहिती लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी दिली.

लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू
लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू

श्रीनगर - चीन-भारतादरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. चीनपाठोपाठ पाकिस्तानी सैन्यांच्याही सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. मात्र, भारतीय जवानही सतर्क असून कोणत्याही कारवाईला ते चोख प्रत्युत्तर देत आहेत. गेल्या वर्षींपेक्षा जास्त घुसखोरीच्या घटना यंदा रोखण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानातून घुसखोरीचा आकडा 130 च्या जवळपास होता. मात्र, यावर्षी ही आकडेवारी 30 ने कमी झाली आहे, अशी माहिती लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी दिली.

भारतीय गुप्त संघटनांच्या माहितीनुसार पाकिस्तानी सीमेवर जवळपास 250 ते 300 दहशतवादी आहेत. आम्ही त्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना असफल केले आहे. घुसखोरीचा आकडा कमी झाल्याने अंतर्गत परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होते. आज पपाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारे तस्करीचा दहशतवाद्यांचा कट भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, पाकिस्तानची वृत्ती बदलेली नाही, असे ते म्हणाले.

तथापि, पाकिस्तान लष्कर पुरस्कृत दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी उत्तर काश्मीरमधील केरेन स्केटरमध्ये 9 ऑक्टोंबरला जवानांना तैनात केले आहे. किशन गंगा नदीच्या काठावर जवानांना दहशतवाद्यांच्या हालचाली आढळून आल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्त मोहीम राबवली. संबधित दहशतवादी हत्यारांची तस्करी करत होते. जवानांनी त्यांच्याकडून चार एके 74 रायफल, आठ मॅग्जीन आणि 240 एके रायफल दारूगोळा जप्त केला आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याबद्दल पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवण्यात आले आहे. 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान एफएटीएफची व्हर्च्युअल बैठक होणार असून या बैठकीत पाकिस्तान ग्रे यादीत राहणार की, काळ्या यादीत पडणार यावर निर्णय होणार आहे. पाकिस्तानने दहशतवाद रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे.

श्रीनगर - चीन-भारतादरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. चीनपाठोपाठ पाकिस्तानी सैन्यांच्याही सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. मात्र, भारतीय जवानही सतर्क असून कोणत्याही कारवाईला ते चोख प्रत्युत्तर देत आहेत. गेल्या वर्षींपेक्षा जास्त घुसखोरीच्या घटना यंदा रोखण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानातून घुसखोरीचा आकडा 130 च्या जवळपास होता. मात्र, यावर्षी ही आकडेवारी 30 ने कमी झाली आहे, अशी माहिती लष्कराचे टॉप कमांडर लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी दिली.

भारतीय गुप्त संघटनांच्या माहितीनुसार पाकिस्तानी सीमेवर जवळपास 250 ते 300 दहशतवादी आहेत. आम्ही त्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना असफल केले आहे. घुसखोरीचा आकडा कमी झाल्याने अंतर्गत परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत होते. आज पपाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारे तस्करीचा दहशतवाद्यांचा कट भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, पाकिस्तानची वृत्ती बदलेली नाही, असे ते म्हणाले.

तथापि, पाकिस्तान लष्कर पुरस्कृत दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी उत्तर काश्मीरमधील केरेन स्केटरमध्ये 9 ऑक्टोंबरला जवानांना तैनात केले आहे. किशन गंगा नदीच्या काठावर जवानांना दहशतवाद्यांच्या हालचाली आढळून आल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्त मोहीम राबवली. संबधित दहशतवादी हत्यारांची तस्करी करत होते. जवानांनी त्यांच्याकडून चार एके 74 रायफल, आठ मॅग्जीन आणि 240 एके रायफल दारूगोळा जप्त केला आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याबद्दल पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवण्यात आले आहे. 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान एफएटीएफची व्हर्च्युअल बैठक होणार असून या बैठकीत पाकिस्तान ग्रे यादीत राहणार की, काळ्या यादीत पडणार यावर निर्णय होणार आहे. पाकिस्तानने दहशतवाद रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे.

Last Updated : Oct 10, 2020, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.