ETV Bharat / bharat

दिलासादायक... देशभरात कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के

author img

By

Published : May 20, 2020, 8:07 AM IST

सध्या देशात 58 हजार कोरोना अॅक्टीव्ह केसेस आहेत. यामध्ये 2.9 टक्केच लोकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. देशभरामध्ये आतापर्यंत 24 लाख 25 हजार 742 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

India's coronavirus cases
India's coronavirus cases

नवी दिल्ली - देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता लाखाच्या घरात पोहचली आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णाचा दरही वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

सध्या देशात 58 हजार कोरोना अॅक्टीव्ह केसेस आहेत. यामध्ये 2.9 टक्केच लोकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. देशभरामध्ये आतापर्यंत 24 लाख 25 हजार 742 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारत इतर देशांपेक्षा चांगल्या स्थितीत असून कोरोना संकटात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. यासाठी सरकार परप्रांतीय कामगार आणि परदेशातून परत आलेल्यांची कोरोना चाचणी 'आरटी-पीसीआर' आधारित 'पूल टेस्टिंग' द्वारे करणार आहे.

देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 4.0 बाबत गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. राज्यांतील कोरोना रुग्णांच्या परिस्थितीनुसार 5 झोन तयार करण्यात आले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन, कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन असे 5 झोन असणार आहेत. कंटेंन्मेंट झोन नसलेल्या भागात शॉपिंग मॉल वगळता इतर दुकाने सुरू करता येऊ शकतात.

नवी दिल्ली - देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता लाखाच्या घरात पोहचली आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णाचा दरही वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 38.73 टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

सध्या देशात 58 हजार कोरोना अॅक्टीव्ह केसेस आहेत. यामध्ये 2.9 टक्केच लोकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. देशभरामध्ये आतापर्यंत 24 लाख 25 हजार 742 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारत इतर देशांपेक्षा चांगल्या स्थितीत असून कोरोना संकटात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. यासाठी सरकार परप्रांतीय कामगार आणि परदेशातून परत आलेल्यांची कोरोना चाचणी 'आरटी-पीसीआर' आधारित 'पूल टेस्टिंग' द्वारे करणार आहे.

देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 4.0 बाबत गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. राज्यांतील कोरोना रुग्णांच्या परिस्थितीनुसार 5 झोन तयार करण्यात आले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन, कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन असे 5 झोन असणार आहेत. कंटेंन्मेंट झोन नसलेल्या भागात शॉपिंग मॉल वगळता इतर दुकाने सुरू करता येऊ शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.