ETV Bharat / bharat

खुलेपणानं खटला चालवण्याचे मान्य करा, कुलभूषण प्रकरणी भारताने पाकला सुनावले

author img

By

Published : Oct 8, 2020, 8:42 PM IST

कुलभूषण जाधव यांच्यावरील खटला चालविण्यासाठी वकील नेमण्यास भारत असमर्थ ठरल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. मात्र, त्यास आज भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. पाकिस्तानने या खटल्याची प्रक्रिया विना अडथळा, विनाअट आणि खुलेपणाने करण्याचे मान्य करावे, असे भारताने सुनावले आहे.

file pic
कुलभूषण जाधव संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - कुलभूषण जाधव खटल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानला नियमांचे पालन करण्याबाबत पुन्हा एकदा सुनावले आहे. आधी पाकिस्तानने या खटल्याची प्रक्रिया विनाअडथळा, विनाअट आणि खुलेपणाने करण्याचे मान्य करावे, असे भारताने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने खुलेपणाने वकिली सहाय्य( कौन्सिलर अ‌ॅक्सेस) द्यावे, असे भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.

पाकिस्तानचा कांगावा

कुलभूषण जाधव यांच्यावरील खटला चालविण्यासाठी वकील नेमण्यास भारत असमर्थ ठरल्याचा कांगावा पाकिस्तानने केला होता. मात्र, त्यास आज भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटला नव्याने लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पाकिस्तान प्रक्रिया पार पाडत आहे. मात्र, त्यात पारदर्शीपणा नसल्याचा आरोप भारताने केला आहे.

काय आहे भारताची मागणी?

खटल्यातील मुख्य मुद्द्यांना मार्गी लावण्यास पाकिस्तान अपयशी ठरला आहे, असे वक्तव्य परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी केले आहे.

पारदर्शी आणि खुल्या वातावरणात हा खटला चालवण्यास पाकिस्तान नकार देत असल्याचा आक्षेप भारताने घेतला आहे. तसेच जाधव यांच्या खटल्यासाठी नेमण्यात येणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्याशी त्यांना एकांतात आणि खुलेपणाने बोलू देण्यास पाकिस्तान नकार देत असल्याचे भारताने म्हटले आहे. त्यामुळे भारताने या प्रक्रियेसच विरोध दर्शविला आहे. तरीही पाकिस्तानने भारताच्या सहभागाशिवाय खटल्याचे कामकाज सुरू ठेवले आहे. भारताने निष्पक्षपणे खटला चालविण्याची मागणी केली आहे.

जाधव यांच्या खटल्यासाठी जो वकील नेमला जाईल त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले जावे. निःपक्ष आणि खुल्या वातावरणात हा खटला चालावा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे वारंवार केली आहे. मात्र, भारताची मागणी पाकिस्तानने धुडकाऊन लावली आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश मानत नसल्याचेही भारताने म्हटले आहे. वकील नेमण्यास याआधीही पाकिस्तानी न्यायालयाने भारताला मुदतवाढ दिली होती. मात्र, ही प्रक्रिया सदोष असल्याचे म्हणत भारताने पुढे जाण्यास नकार दिला आहे.

काय आहे कुलभूषण जाधव प्रकरण?

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने 3 मार्च 2016 मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तेव्हापासून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या प्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरारष्ट्रीय न्यायालयात खोडून काढले होते. १७ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती. याचबरोबर त्यांनी जाधव यांना राजकीय मदत देण्याचे आदेशही पाकिस्तानला दिले होते.

नवी दिल्ली - कुलभूषण जाधव खटल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानला नियमांचे पालन करण्याबाबत पुन्हा एकदा सुनावले आहे. आधी पाकिस्तानने या खटल्याची प्रक्रिया विनाअडथळा, विनाअट आणि खुलेपणाने करण्याचे मान्य करावे, असे भारताने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने खुलेपणाने वकिली सहाय्य( कौन्सिलर अ‌ॅक्सेस) द्यावे, असे भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.

पाकिस्तानचा कांगावा

कुलभूषण जाधव यांच्यावरील खटला चालविण्यासाठी वकील नेमण्यास भारत असमर्थ ठरल्याचा कांगावा पाकिस्तानने केला होता. मात्र, त्यास आज भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटला नव्याने लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पाकिस्तान प्रक्रिया पार पाडत आहे. मात्र, त्यात पारदर्शीपणा नसल्याचा आरोप भारताने केला आहे.

काय आहे भारताची मागणी?

खटल्यातील मुख्य मुद्द्यांना मार्गी लावण्यास पाकिस्तान अपयशी ठरला आहे, असे वक्तव्य परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी केले आहे.

पारदर्शी आणि खुल्या वातावरणात हा खटला चालवण्यास पाकिस्तान नकार देत असल्याचा आक्षेप भारताने घेतला आहे. तसेच जाधव यांच्या खटल्यासाठी नेमण्यात येणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्याशी त्यांना एकांतात आणि खुलेपणाने बोलू देण्यास पाकिस्तान नकार देत असल्याचे भारताने म्हटले आहे. त्यामुळे भारताने या प्रक्रियेसच विरोध दर्शविला आहे. तरीही पाकिस्तानने भारताच्या सहभागाशिवाय खटल्याचे कामकाज सुरू ठेवले आहे. भारताने निष्पक्षपणे खटला चालविण्याची मागणी केली आहे.

जाधव यांच्या खटल्यासाठी जो वकील नेमला जाईल त्याला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले जावे. निःपक्ष आणि खुल्या वातावरणात हा खटला चालावा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे वारंवार केली आहे. मात्र, भारताची मागणी पाकिस्तानने धुडकाऊन लावली आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश मानत नसल्याचेही भारताने म्हटले आहे. वकील नेमण्यास याआधीही पाकिस्तानी न्यायालयाने भारताला मुदतवाढ दिली होती. मात्र, ही प्रक्रिया सदोष असल्याचे म्हणत भारताने पुढे जाण्यास नकार दिला आहे.

काय आहे कुलभूषण जाधव प्रकरण?

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने 3 मार्च 2016 मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले होते. तेव्हापासून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या प्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरारष्ट्रीय न्यायालयात खोडून काढले होते. १७ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती. याचबरोबर त्यांनी जाधव यांना राजकीय मदत देण्याचे आदेशही पाकिस्तानला दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.