ETV Bharat / bharat

गोव्याला आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र म्हणून विकसित करणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

author img

By

Published : Dec 13, 2019, 6:07 PM IST

दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेच्या सभागृहात 'मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्याच्या विविध भागातील नामवंत वैज्ञानिकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

goa
दोनापावल येथे 'मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवा'चे आयोजन

पणजी - गोवा सरकार शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत आहे. लवकरच गोव्याला आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेच्या सभागृहात आयोजित 'मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवा'च्या उद्घाटान प्रसंगी ते बोलत होते.

दोनापावल येथे 'मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवा'चे आयोजन

आजपासून दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्याच्या विविध भागातील नामवंत वैज्ञानिकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. विज्ञान महोत्सव यापुढेही सुरू राहावा यासाठी गोवा सरकारने कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रीअल रीसर्च आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था यांच्याशी यावेळी सामंजस्य करार केला. या करारावर राज्याचे मुख्य सचिव परिमल राय आणि दौलत हवालदार यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने तयार केलेल्या मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित 'लीजेंड' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी मंत्री मायकल लोबो यांनी विज्ञान महोत्सव आयोजनाचा हेतू आणि पर्रीकर यांचा या संदर्भातील दृष्टीकोन स्पष्ट केला.

यावेळी बोलताना डॉ. विजय राघवन म्हणाले, "विज्ञान महोत्सव हा मार्गदर्शनासाठी चांगला पायंडा आहे. तज्ञांकडून दिले जाणारे ज्ञान भविष्यात उपयुक्त ठरणारे आहे. पर्यावरण आणि सागरी संपत्ती संवर्धनासाठी गोव्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. या आधारे येथील नैसर्गिक स्रोत विकसित करण्यास मदत होईल"

हेही वाचा - #PlasticFreeIndia: पानांचे द्रोण ठरत आहेत प्लास्टिकमुक्त भारतासाठी वरदान !

आज पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे कचरा व्यवस्थापन तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार डॉ. के. विजयराघवन, डॉ. अजयकुमार सूद, गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय, सागर विज्ञान संस्थेचे संचालक प्रा. सुनीलकुमार सिंग, राज्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव दौलत हवालदार आणि जूझे म्यॅन्युअल मनोरमा आदी उपस्थित होते.

चेंगराचेंगरी टाळण्यासाठी उपयुक्त संशोधन

उद्घाटन सत्रात प्रा. अजयकुमार सूद यांचे व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी 'निसर्ग हीच विज्ञानाची प्रेरणा : आम्ही समुहाने एकत्र का राहतो?' याविषयावरील आपले संशोधन मांडले. समुह मानसिकता कशी घडते यासाठी चार वर्षांहून अधिक काळ त्यानी संशोधन केले आहे. या संदर्भातील मुंग्या, पक्षी आणि वन्यप्राण्यांची मानसिकताही अभ्यासली आहे. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी का होते, या निष्कर्षापर्यंत ते पोहोचलो. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी काय उपाय योजना करता येऊ शकता याचे त्यांनी यावेळी विश्लेषन केले.

पणजी - गोवा सरकार शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत आहे. लवकरच गोव्याला आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेच्या सभागृहात आयोजित 'मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवा'च्या उद्घाटान प्रसंगी ते बोलत होते.

दोनापावल येथे 'मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवा'चे आयोजन

आजपासून दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्याच्या विविध भागातील नामवंत वैज्ञानिकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. विज्ञान महोत्सव यापुढेही सुरू राहावा यासाठी गोवा सरकारने कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रीअल रीसर्च आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था यांच्याशी यावेळी सामंजस्य करार केला. या करारावर राज्याचे मुख्य सचिव परिमल राय आणि दौलत हवालदार यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने तयार केलेल्या मनोहर पर्रीकर यांच्यावर आधारित 'लीजेंड' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी मंत्री मायकल लोबो यांनी विज्ञान महोत्सव आयोजनाचा हेतू आणि पर्रीकर यांचा या संदर्भातील दृष्टीकोन स्पष्ट केला.

यावेळी बोलताना डॉ. विजय राघवन म्हणाले, "विज्ञान महोत्सव हा मार्गदर्शनासाठी चांगला पायंडा आहे. तज्ञांकडून दिले जाणारे ज्ञान भविष्यात उपयुक्त ठरणारे आहे. पर्यावरण आणि सागरी संपत्ती संवर्धनासाठी गोव्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. या आधारे येथील नैसर्गिक स्रोत विकसित करण्यास मदत होईल"

हेही वाचा - #PlasticFreeIndia: पानांचे द्रोण ठरत आहेत प्लास्टिकमुक्त भारतासाठी वरदान !

आज पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे कचरा व्यवस्थापन तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो, भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार डॉ. के. विजयराघवन, डॉ. अजयकुमार सूद, गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय, सागर विज्ञान संस्थेचे संचालक प्रा. सुनीलकुमार सिंग, राज्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव दौलत हवालदार आणि जूझे म्यॅन्युअल मनोरमा आदी उपस्थित होते.

चेंगराचेंगरी टाळण्यासाठी उपयुक्त संशोधन

उद्घाटन सत्रात प्रा. अजयकुमार सूद यांचे व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी 'निसर्ग हीच विज्ञानाची प्रेरणा : आम्ही समुहाने एकत्र का राहतो?' याविषयावरील आपले संशोधन मांडले. समुह मानसिकता कशी घडते यासाठी चार वर्षांहून अधिक काळ त्यानी संशोधन केले आहे. या संदर्भातील मुंग्या, पक्षी आणि वन्यप्राण्यांची मानसिकताही अभ्यासली आहे. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी का होते, या निष्कर्षापर्यंत ते पोहोचलो. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी काय उपाय योजना करता येऊ शकता याचे त्यांनी यावेळी विश्लेषन केले.

Intro:पणजी : गोवा सरकार शिक्षणाकडे गांभीर्याने पाहत आहे. गोवा शैक्षणिक हब बनवत असताना लवकरच आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र सुरू केले जाणार आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीत केले. दोनापावल येथील राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था सभागृहात आयोजित मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे उद्घाटा म्हणून ते बोलत होते.


Body:दोन दिवसाच्या या महोत्सवात राज्याच्या विविध भागात नामवंत वैज्ञानिकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. आजच्या उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे कचरा व्यवस्थापन तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकर लोबो, भारत सरकारचे मुख्य विज्ञान सल्लागार डॉ. के. विजयराघवन, डॉ. अजयकुमार सूद, गोव्याचे मुख्य सचिव परिमल राय, सागर विज्ञान संस्थेचे संचालक प्रा. सुनीलकुमार सिंग, राज्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव दौलत हवालदार आणि जूझे म्यँन्युअल मनोरमा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
विज्ञान महोत्सव पुढे कायम सुरू रहावा यासाठी गोवा सरकारने कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रीअल रीसर्च आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था यांच्याशी सामंजस्य करार केले. ज्यावर अनुक्रमे राज्याचे मुख्य सचिव राय आणि हवालदार यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने तयार केलेल्या पर्रीकर यांच्यावर आधारित ' लीजेंड' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. विजयराघवन म्हणाले, विज्ञान महोत्सव हा मार्गदर्शनासाठी चांगला पायंडा आहे. तज्ञांकडून दिले जाणारे ज्ञान भविष्यात उपयुक्त ठरणारे आहे. पर्यावरण आणि सागरी संपत्ती संवर्धनासाठी गोव्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे. या आधारे येथील नैसर्गिक स्रोत विकसित करण्यास मदत होईल.
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी उपयुक्त संशोधन
उद्घाटन सत्रात प्रा. अजयकुमार सूद यांचे व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी 'निसर्ग हीच विज्ञानाची प्रेरणा : आम्ही समुहाने एकत्र का राहतो? याविषयावरील आपले संशोधन मांडले. समुह मानसिकता कशी घडते यासाठी चारवर्षांहून अधिक काळ संशोधन केले. या संदर्भातील मुंग्या, पक्षी, वन्यप्राणी यांची मानसिकता अभ्यासली. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी का होते या निष्कर्षापर्यंत पोहोचलो. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी काय उपाय योजना करता येऊ शकता याचेही त्यांनी पावरपॉईंट सादरीकरण केले.
तत्पूर्वी, मंत्री मायकल लोबो यांनी विज्ञान महोत्सव आयोजनाचा हेतू आणि पर्रीकर यांचा या संदर्भातील द्रचष्टीकोन स्पष्ट केला. यावेळी भाजप पदाधिकारी, उद्योजक आणि अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.