ETV Bharat / bharat

कृषी कायदे विरोधी आंदोलन : आप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

author img

By

Published : Oct 13, 2020, 9:04 AM IST

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह संजय सिंह, गोपाल राय, सुशील गुप्ता आणि भगवंत मान अशा अनेक नेत्यांनी या आंदोलनाला हजेरी लावली. यांच्यासोबत पंजाबमधील काही नेत्यांनीही आंदोलकांना संबोधित केले. यादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला. यानंतर आंदोलकांनी जेव्हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी बऱ्याच आंदोलकांना ताब्यात घेतले.

FIR under epedemic ACT on AAP protest in jantar mantar delhi
कृषी कायदे विरोधी आंदोलन : आप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

नवी दिल्ली : सरकारने काही दिवसांपूर्वी मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलने सुरुच आहेत. सोमवारी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचे याबाबत आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला आम आदमी पक्षाने ही पाठिंबा दिला होता. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षातील अन्य नेत्यांनीही या आंदोलनाला हजेरी लावली होती.

कृषी कायदे विरोधी आंदोलन : आप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा..

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह संजय सिंह, गोपाल राय, सुशील गुप्ता आणि भगवंत मान अशा अनेक नेत्यांनी या आंदोलनाला हजेरी लावली. यांच्यासोबत पंजाबमधील काही नेत्यांनीही आंदोलकांना संबोधित केले. यादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला. यानंतर आंदोलकांनी जेव्हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी बऱ्याच आंदोलकांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी एकूण १३७ आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये सात महिलांचा समावेश होता. या सर्वांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी उशीरा त्यांना सोडण्यात आले. या सर्वांवर पोलिसांनी महामारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कोणत्याही प्रकारची सार्वजनिक सभा किंवा बैठक आयोजित करण्याची परवानगी नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिल्ली सरकारनेच हा नियम लागू केला आहे, आणि तरीही मुख्यमंत्रीच अशा प्रकारे आंदोलनांमध्ये सहभागी होताना दिसून येत आहे.

हेही वाचा : कोरोना इफेक्ट : लाल किल्ल्यावरील भव्य रामलीला सोहळा ८० वर्षांत पहिल्यांदाच रद्द

नवी दिल्ली : सरकारने काही दिवसांपूर्वी मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलने सुरुच आहेत. सोमवारी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचे याबाबत आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला आम आदमी पक्षाने ही पाठिंबा दिला होता. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षातील अन्य नेत्यांनीही या आंदोलनाला हजेरी लावली होती.

कृषी कायदे विरोधी आंदोलन : आप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा..

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह संजय सिंह, गोपाल राय, सुशील गुप्ता आणि भगवंत मान अशा अनेक नेत्यांनी या आंदोलनाला हजेरी लावली. यांच्यासोबत पंजाबमधील काही नेत्यांनीही आंदोलकांना संबोधित केले. यादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला. यानंतर आंदोलकांनी जेव्हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी बऱ्याच आंदोलकांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी एकूण १३७ आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये सात महिलांचा समावेश होता. या सर्वांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी उशीरा त्यांना सोडण्यात आले. या सर्वांवर पोलिसांनी महामारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कोणत्याही प्रकारची सार्वजनिक सभा किंवा बैठक आयोजित करण्याची परवानगी नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दिल्ली सरकारनेच हा नियम लागू केला आहे, आणि तरीही मुख्यमंत्रीच अशा प्रकारे आंदोलनांमध्ये सहभागी होताना दिसून येत आहे.

हेही वाचा : कोरोना इफेक्ट : लाल किल्ल्यावरील भव्य रामलीला सोहळा ८० वर्षांत पहिल्यांदाच रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.