ETV Bharat / bharat

मृत्यू म्हणजे अतिशय प्रिय असा मित्र : महात्मा गांधी

author img

By

Published : Sep 18, 2019, 6:11 AM IST

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त, आपण गांधीजी आणि त्यांच्या विचारांबद्दल जाणून घेत आहोत. आजच्या लेखामध्ये आपण गांधीजींचे मृत्यूबद्दलचे काय विचार होते हे जाणून घेणार आहोत. हा लेख सौरभ बाजपायी यांनी लिहिला आहे. लेखक राष्ट्रीय चळवळ मोर्चाचे संयोजक आहेत, जी स्वातंत्र्यलढ्याचे प्रातिनिधित्व करणारी संस्था आहे. तसेच, दिल्ली विद्यापिठाच्या, देशबंधू महाविद्यालयात इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

Death is a dearest comapnion : Mahatma Gandhi

नवी दिल्ली - संपूर्ण देश जरी गांधीजींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त उत्साही असला, तरी गांधीजींचे मृत्यूबद्दलचे विचार जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गांधींबद्दल बोलला किंवा लिहिला गेला नाही असा एकही विषय नसेल. किंवा मग त्यांनी एखाद्या गोष्टीबद्दल विचार केला नाही किंवा बोलले अथवा लिहिले नाही असे कधी झाले नसेल. अगदी स्वतःच्या मृत्यूबाबतही त्यांनी अगदी विस्तारपूर्वक विचार केला आहे.

आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, गांधीजींनी निर्भयतेवर भरपूर जोर दिला. या निर्भयतेनेच त्यांना सर्व प्रकारच्या भीतींपासून मुक्त केले. म्हणूनच ते मृत्यूच्या भीतीतून स्वत: ला मुक्त करू शकले.

'सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका' या त्यांच्या पुस्तकात गांधीजी लिहितात, की प्रत्येकाला विधात्याबद्दल भीतीयुक्त आदर असायला हवा. जन्म आणि मृत्यूमधील संबंधांबद्दल बोलताना ते लिहितात, की जेव्हा मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ येईल, तेव्हा त्याचे असे स्वागत केले पाहिजे, जणू युगानुयुगे न भेटलेल्या मित्राला आपण भेटत आहोत. 'यंग इंडिया' मध्ये, ३० डिसेंबर १९२६ रोजी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, मृत्यू हा केवळ चांगला मित्र नाही, तर अतिशय प्रिय मित्र आहे.

हेही वाचा : महात्मा गांधी : एक व्यावहारिक आदर्शवादी

त्यामुळेच, गांधीजींसाठी मृत्यू हा तेवढा भीतीदायक नव्हता. त्याचप्रमाणे, त्यांनी कुठेतरी म्हटले आहे, की कोणत्याही वेळी मृत्यू येणे हे भाग्याची गोष्ट आहे, मात्र सत्याचे ध्येय गाठण्यासाठी मरण पावलेल्या योद्ध्यासाठी मृत्यू म्हणजे अहोभाग्य होय. इथे सत्याचा आणि निर्भयपणाचा अगदी घनिष्ठ संबंध गांधीजींनी दाखवला आहे.

हेच कारण आहे, की गांधीजी आपले 'सत्य' वाचवण्यासाठी आपले बलिदान देखील देण्यास सदैव तत्पर राहिले. आचार्य जे. बी. कृपलानी, ज्यांना गांधीजींच्या रणनीतीची अगदी जवळून माहिती आहे, ते लिहितात की गांधीजींना जर कधी हे समजले की शहीद होण्याच्या संधी फारच कमी झाल्या आहेत, तेव्हा ते नवीन परिस्थितीचा शोध घेण्यात व्यस्त होतील.

३० जानेवारी १९४८ च्या आधीही गांधीजींच्या हत्येचे बरेच प्रयत्न झाले. दक्षिण आफ्रिकेमध्येही त्यांनी एका ब्रिटिश मित्राची सुटका केल्यामुळे त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. १९३४ नंतर तर त्यांच्या जीवाला कायम धोका होता. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्यांनी हे मान्य केले होते, की भारताला फक्त त्यांचीच नाही तर त्यांच्या प्राणांचीही गरज आहे.

हेही वाचा : गांधीजींचे संवादकौशल्य आणि संज्ञापनातील गांधीवाद...

आयुष्यातील अनेक संकटांची जाणीव असूनदेखील गांधीजींनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा घेणे टाळले. १९४४ मध्ये त्यांनी १२५ वर्षे जगण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना नक्कीच मृत्यूचे भय नव्हते. यामुळेच ते बऱ्याचवेळा लोकांच्या मताविरुद्ध असलेले निर्णय घेऊ शकले. मग ती हरिजन यात्रा असो, किंवा त्यांचा जातीयवादाविरूद्धचा संघर्ष. कोणी सोबत असो वा नसो, ते एखादा निर्णय घेऊन त्या मार्गावर एकटेच चालण्यास कचरत नव्हते.

नोआखलीच्या छोट्या खेड्यांमधील हिंदूंचे प्राण वाचवण्यासाठी गांधीजींनी स्वतः प्रयत्न केला. लोकांवर त्यांचा नैतिक प्रभाव इतका झाला, की ते त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत, किंवा त्यांनी जे करण्यास सांगितले ते नाकारू शकले नाहीत. यामुळे गांधीजींचे 'महात्मा' मध्ये रूपांतर झाले. एक असा महात्मा, ज्याने जीवन आणि मृत्यू दोघांनाही शाश्वत सत्य म्हणून स्वीकारले होते आणि स्वतःला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त केले होते.

हेही वाचा : महात्मा गांधी : विज्ञानवादी की विज्ञान-विरोधी..?

नवी दिल्ली - संपूर्ण देश जरी गांधीजींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त उत्साही असला, तरी गांधीजींचे मृत्यूबद्दलचे विचार जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गांधींबद्दल बोलला किंवा लिहिला गेला नाही असा एकही विषय नसेल. किंवा मग त्यांनी एखाद्या गोष्टीबद्दल विचार केला नाही किंवा बोलले अथवा लिहिले नाही असे कधी झाले नसेल. अगदी स्वतःच्या मृत्यूबाबतही त्यांनी अगदी विस्तारपूर्वक विचार केला आहे.

आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, गांधीजींनी निर्भयतेवर भरपूर जोर दिला. या निर्भयतेनेच त्यांना सर्व प्रकारच्या भीतींपासून मुक्त केले. म्हणूनच ते मृत्यूच्या भीतीतून स्वत: ला मुक्त करू शकले.

'सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका' या त्यांच्या पुस्तकात गांधीजी लिहितात, की प्रत्येकाला विधात्याबद्दल भीतीयुक्त आदर असायला हवा. जन्म आणि मृत्यूमधील संबंधांबद्दल बोलताना ते लिहितात, की जेव्हा मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ येईल, तेव्हा त्याचे असे स्वागत केले पाहिजे, जणू युगानुयुगे न भेटलेल्या मित्राला आपण भेटत आहोत. 'यंग इंडिया' मध्ये, ३० डिसेंबर १९२६ रोजी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, मृत्यू हा केवळ चांगला मित्र नाही, तर अतिशय प्रिय मित्र आहे.

हेही वाचा : महात्मा गांधी : एक व्यावहारिक आदर्शवादी

त्यामुळेच, गांधीजींसाठी मृत्यू हा तेवढा भीतीदायक नव्हता. त्याचप्रमाणे, त्यांनी कुठेतरी म्हटले आहे, की कोणत्याही वेळी मृत्यू येणे हे भाग्याची गोष्ट आहे, मात्र सत्याचे ध्येय गाठण्यासाठी मरण पावलेल्या योद्ध्यासाठी मृत्यू म्हणजे अहोभाग्य होय. इथे सत्याचा आणि निर्भयपणाचा अगदी घनिष्ठ संबंध गांधीजींनी दाखवला आहे.

हेच कारण आहे, की गांधीजी आपले 'सत्य' वाचवण्यासाठी आपले बलिदान देखील देण्यास सदैव तत्पर राहिले. आचार्य जे. बी. कृपलानी, ज्यांना गांधीजींच्या रणनीतीची अगदी जवळून माहिती आहे, ते लिहितात की गांधीजींना जर कधी हे समजले की शहीद होण्याच्या संधी फारच कमी झाल्या आहेत, तेव्हा ते नवीन परिस्थितीचा शोध घेण्यात व्यस्त होतील.

३० जानेवारी १९४८ च्या आधीही गांधीजींच्या हत्येचे बरेच प्रयत्न झाले. दक्षिण आफ्रिकेमध्येही त्यांनी एका ब्रिटिश मित्राची सुटका केल्यामुळे त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. १९३४ नंतर तर त्यांच्या जीवाला कायम धोका होता. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्यांनी हे मान्य केले होते, की भारताला फक्त त्यांचीच नाही तर त्यांच्या प्राणांचीही गरज आहे.

हेही वाचा : गांधीजींचे संवादकौशल्य आणि संज्ञापनातील गांधीवाद...

आयुष्यातील अनेक संकटांची जाणीव असूनदेखील गांधीजींनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा घेणे टाळले. १९४४ मध्ये त्यांनी १२५ वर्षे जगण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना नक्कीच मृत्यूचे भय नव्हते. यामुळेच ते बऱ्याचवेळा लोकांच्या मताविरुद्ध असलेले निर्णय घेऊ शकले. मग ती हरिजन यात्रा असो, किंवा त्यांचा जातीयवादाविरूद्धचा संघर्ष. कोणी सोबत असो वा नसो, ते एखादा निर्णय घेऊन त्या मार्गावर एकटेच चालण्यास कचरत नव्हते.

नोआखलीच्या छोट्या खेड्यांमधील हिंदूंचे प्राण वाचवण्यासाठी गांधीजींनी स्वतः प्रयत्न केला. लोकांवर त्यांचा नैतिक प्रभाव इतका झाला, की ते त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत, किंवा त्यांनी जे करण्यास सांगितले ते नाकारू शकले नाहीत. यामुळे गांधीजींचे 'महात्मा' मध्ये रूपांतर झाले. एक असा महात्मा, ज्याने जीवन आणि मृत्यू दोघांनाही शाश्वत सत्य म्हणून स्वीकारले होते आणि स्वतःला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त केले होते.

हेही वाचा : महात्मा गांधी : विज्ञानवादी की विज्ञान-विरोधी..?

Intro:Body:



मृत्यू म्हणजे अतिशय प्रिय असा मित्र : महात्मा गांधी



महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त, आपण गांधीजी आणि त्यांच्या विचारांबद्दल जाणून घेत आहोत. आजच्या लेखामध्ये आपण गांधीजींचे मृत्यूबद्दलचे काय विचार होते हे जाणून घेणार आहोत. हा लेख सौरभ बाजपायी यांनी लिहिला आहे. लेखक राष्ट्रीय चळवळ मोर्चाचे संयोजक आहेत, जी स्वातंत्र्यलढ्याचे प्रातिनिधित्व करणारी संस्था आहे. तसेच, दिल्ली विद्यापिठाच्या, देशबंधू महाविद्यालयात इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.



नवी दिल्ली - संपूर्ण देश जरी गांधीजींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त उत्साही असला, तरी गांधीजींचे मृत्यूबद्दलचे विचार जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गांधींबद्दल बोलला किंवा लिहिला गेला नाही असा एकही विषय नसेल. किंवा मग त्यांनी एखाद्या गोष्टीबद्दल विचार केला नाही किंवा बोलले अथवा लिहिले नाही असे कधी झाले नसेल. अगदी स्वतःच्या मृत्यूबाबतही त्यांनी अगदी विस्तारपूर्वक विचार केला आहे.

आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, गांधीजींनी निर्भयतेवर भरपूर जोर दिला. या निर्भयतेनेच त्यांना सर्व प्रकारच्या भीतींपासून मुक्त केले. म्हणूनच ते मृत्यूच्या भीतीतून स्वत: ला मुक्त करू शकले.

सत्याग्रह इन 'साऊथ आफ्रिका' या त्यांच्या पुस्तकात, गांधीजी लिहितात, की प्रत्येकाला विधात्याबद्दल भीतीयुक्त आदर असायला हवा. जन्म आणि मृत्यूमधील संबंधांबद्दल बोलताना ते लिहितात, की जेव्हा मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ येईल, तेव्हा त्याचे असे स्वागत केले पाहिजे, जणू युगानुयुगे न भेटलेल्या मित्राला आपण भेटत आहोत. 'यंग इंडिया' मध्ये, ३० डिसेंबर १९२६ रोजी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, मृत्यू हा केवळ चांगला मित्र नाही, तर अतिशय प्रिय मित्र आहे.

त्यामुळेच, गांधीजींसाठी मृत्यू हा तेवढा भीतीदायक नव्हता. त्याचप्रमाणे, त्यांनी कुठेतरी म्हटले आहे, की कोणत्याही वेळी मृत्यू येणे हे भाग्याची गोष्ट आहे, मात्र सत्याचे ध्येय गाठण्यासाठी मरण पावलेल्या योद्ध्यासाठी मृत्यू म्हणजे अहोभाग्य होय. इथे सत्याचा आणि निर्भयपणाचा अगदी घनिष्ठ संबंध गांधीजींनी दाखवला आहे.

हेच कारण आहे, की गांधीजी आपले 'सत्य' वाचवण्यासाठी आपले बलिदान देखील देण्यास सदैव तत्पर राहिले. आचार्य जे. बी. कृपलानी, ज्यांना गांधीजींच्या रणनीतीची अगदी जवळून माहिती आहे, ते लिहितात की गांधीजींना जर कधी हे समजले की शहीद होण्याच्या संधी फारच कमी झाल्या आहेत, तेव्हा ते नवीन परिस्थितीचा शोध घेण्यात व्यस्त होतील.

३० जानेवारी १९४८ च्या आधीही गांधीजींच्या हत्येचे बरेच प्रयत्न झाले. दक्षिण आफ्रिकेमध्येही त्यांनी एका ब्रिटिश मित्राची सुटका केल्यामुळे त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. १९३४ नंतर तर त्यांच्या जीवाला कायम धोका होता. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्यांनी हे मान्य केले होते, की भारताला फक्त त्यांचीच नाही तर त्यांच्या प्राणांचीही गरज आहे.

आयुष्यातील अनेक संकटांची जाणीव असूनदेखील गांधीजींनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा घेणे टाळले. १९४४ मध्ये त्यांनी १२५ वर्षे जगण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना नक्कीच मृत्यूचे भय नव्हते. यामुळेच ते बऱ्याचवेळा लोकांच्या मताविरुद्ध असलेले निर्णय घेऊ शकले. मग ती हरिजन यात्रा असो, किंवा त्यांचा जातीयवादाविरूद्धचा संघर्ष. कोणी सोबत असो वा नसो, ते एखादा निर्णय घेऊन त्या मार्गावर एकटेच चालण्यास कचरत नव्हते.

नोआखलीच्या छोट्या खेड्यांमधील हिंदूंचे प्राण वाचवण्यासाठी गांधीजींनी स्वतः प्रयत्न केला. लोकांवर त्यांचा नैतिक प्रभाव इतका झाला, की ते त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत, किंवा त्यांनी जे करण्यास सांगितले ते नाकारू शकले नाहीत. यामुळे गांधीजींचे 'महात्मा' मध्ये रूपांतर झाले. एक असा महात्मा, ज्याने जीवन आणि मृत्यू दोघांनाही शाश्वत सत्य म्हणून स्वीकारले होते आणि स्वतःला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त केले होते.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.