ETV Bharat / bharat

आसाममध्ये कार आणि बसच्या अपघातात ४ वन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Aug 31, 2019, 8:30 AM IST

कार आणि बसच्या अपघातामध्ये आसाममधील ४ वन विभागातील कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघात

गुवाहटी - कार आणि बसच्या अपघातामध्ये आसाममधील ४ वन विभागातील कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग ३७ वर शिवसागर शहराजवळ हा भीषण अपघात झाला.

हेही वाचा - चार महिन्यापूर्वी झालं होतं लग्न, कर्नाटकातील अपघातामध्ये पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर

राष्ट्रीय महामार्ग ३७ आसाम आणि मणिपूर राज्यांना जोडतो. एका बसने वन विभागाचे कर्मचारी जात असलेल्या कारला जोरदार धडक दिली. बसची धडक बसल्यानंतर कार रस्त्यावरून खाली फेकली गेली. या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले, असे उप वनअधिकारी पद्मेश्वर गोगाई यांनी सांगितले.

हेही वाचा - पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, 14 ठार तर अनेक जण जखमी

जखमी अधिकाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा - अमरावतीत दुर्दैवी घटना: राखी बांधण्यापूर्वीच भावा-बहिणीचे बंध तुटले

गुवाहटी - कार आणि बसच्या अपघातामध्ये आसाममधील ४ वन विभागातील कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग ३७ वर शिवसागर शहराजवळ हा भीषण अपघात झाला.

हेही वाचा - चार महिन्यापूर्वी झालं होतं लग्न, कर्नाटकातील अपघातामध्ये पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर

राष्ट्रीय महामार्ग ३७ आसाम आणि मणिपूर राज्यांना जोडतो. एका बसने वन विभागाचे कर्मचारी जात असलेल्या कारला जोरदार धडक दिली. बसची धडक बसल्यानंतर कार रस्त्यावरून खाली फेकली गेली. या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले, असे उप वनअधिकारी पद्मेश्वर गोगाई यांनी सांगितले.

हेही वाचा - पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात, 14 ठार तर अनेक जण जखमी

जखमी अधिकाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा - अमरावतीत दुर्दैवी घटना: राखी बांधण्यापूर्वीच भावा-बहिणीचे बंध तुटले

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.