ETV Bharat / bharat

बिहार महापूर : तब्बल 39 लाख लोकांना पुराचा फटका, तर 11 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 31, 2020, 1:58 PM IST

महापुरामुळे बिहारमधील परिस्थिती बिकट झाली आहे. आतापर्यंत महापुराचा तब्बल 39 लाख लोकांना फटका बसला आहे.

महापूर
महापूर

नवी दिल्ली - महापुरामुळे बिहारमधील परिस्थिती बिकट झाली आहे. आतापर्यंत महापुराचा तब्बल 39 लाख लोकांना फटका बसला आहे. नेपाळमधील धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे बिहारमध्ये पूरस्थितीत अधिक वाढ झाली असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

मधुबनी आणि सिवान जिल्ह्यातील 71 पंचायतींना आतापर्यंत पुराचा फटका बसला नव्हता. मात्र, गुरुवारी तेथीलही जनजीवन अस्ताव्यस्त झाले. बाधित जिल्ह्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे. जवळपास 8 हजार लोकांची सुटका केली आहे, ज्यात मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांचा समावेश आहे.

19 मदत शिबिरांमध्ये 25 हजारांपेक्षा जास्त लोकांनी आश्रय घेतला आहे, तर 1 हजारहून अधिक सामुदायिक स्वयंपाकघरात जवळजवळ सहा लाख लोकांना अन्न दिले जात आहे.

महापुराचा सुमारे 39 लाख 63 हजार लोकांना फटका बसला असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृतांची संख्या मात्र 11 वर स्थिर राहिली. आतापर्यंत दरभंगामध्ये सात जणांचा, तर चार जणांचा पश्चिम चंपारणमध्ये मृत्यू झाला आहे. पावसामुळे बिहारमधील चंपारण, किशनगंज, सुपौल, सीतामढ़ी, दरभंगा आदी जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे.

नवी दिल्ली - महापुरामुळे बिहारमधील परिस्थिती बिकट झाली आहे. आतापर्यंत महापुराचा तब्बल 39 लाख लोकांना फटका बसला आहे. नेपाळमधील धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे बिहारमध्ये पूरस्थितीत अधिक वाढ झाली असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

मधुबनी आणि सिवान जिल्ह्यातील 71 पंचायतींना आतापर्यंत पुराचा फटका बसला नव्हता. मात्र, गुरुवारी तेथीलही जनजीवन अस्ताव्यस्त झाले. बाधित जिल्ह्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे. जवळपास 8 हजार लोकांची सुटका केली आहे, ज्यात मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांचा समावेश आहे.

19 मदत शिबिरांमध्ये 25 हजारांपेक्षा जास्त लोकांनी आश्रय घेतला आहे, तर 1 हजारहून अधिक सामुदायिक स्वयंपाकघरात जवळजवळ सहा लाख लोकांना अन्न दिले जात आहे.

महापुराचा सुमारे 39 लाख 63 हजार लोकांना फटका बसला असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मृतांची संख्या मात्र 11 वर स्थिर राहिली. आतापर्यंत दरभंगामध्ये सात जणांचा, तर चार जणांचा पश्चिम चंपारणमध्ये मृत्यू झाला आहे. पावसामुळे बिहारमधील चंपारण, किशनगंज, सुपौल, सीतामढ़ी, दरभंगा आदी जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.