ETV Bharat / bharat

...ही तर सुरुवात, तृणमूल काँग्रेसमध्ये एकट्याच राहतील 'दीदी'

author img

By

Published : Dec 19, 2020, 4:14 PM IST

Updated : Dec 19, 2020, 7:33 PM IST

आत्ता तर ही सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकी पर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसमध्ये एकट्याच राहतील, असे भाजपा नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले. आज त्यांनी बंगालमधील मिदीनापूर येथे सभेला संबोधित केले.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप २०० पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता स्थापन करेल, असा दावा भाजपा नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज केला. ते पश्चिम बंगालमधील मिदीनापूर येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

अमित शाह यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका

ही तर सुरूवात आहे -

आत्ता तर ही सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकी पर्यंत ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसमध्ये एकट्याच राहतील, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या उपस्थितीत तृणमूलची मोठे नेते सुवेंदु अधिकारी यांनी भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे. आमदार शीलभद्रा दत्त आणि बन्सारी मैत्य यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

खऱ्या अर्थाने सोनार बांगला करू -

डाव्या पक्षांना पश्चिम बंगालने 27 वर्षे संधी दिली. तर तृणमूल काँग्रेसला दहा वर्ष संधी दिली. भाजपाला पाच वर्षे संधी द्या, पश्चिम बंगालला खऱ्या अर्थाने सोन्याचा बांगला केल्या शिवाय राहणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

काँग्रेस सोडली तेंव्हा काय केले -

भाजप तृणमूल काँग्रेस फोडत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्याचा समाचारही शाह यांनी घेतला. जेंव्हा ममता यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. तेंव्हा त्यांनी काय केले, असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने ममता यांना केला.

शाह यांचा प. बंगाल दौरा -

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी बंगालमधील दौरे वाढवले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह यांनी मिशन बंगालचे लक्ष्य निश्चित केले. ममता बॅनर्जीही यावेळी भाजपाला गांभीर्याने घेत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - दीदीं’ना हादरा; तृणमूलच्या बड्या नेत्याने केला भाजपामध्ये प्रवेश

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप २०० पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता स्थापन करेल, असा दावा भाजपा नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज केला. ते पश्चिम बंगालमधील मिदीनापूर येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

अमित शाह यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका

ही तर सुरूवात आहे -

आत्ता तर ही सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकी पर्यंत ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसमध्ये एकट्याच राहतील, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या उपस्थितीत तृणमूलची मोठे नेते सुवेंदु अधिकारी यांनी भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर इतर आमदारांनीही राजीनामा देण्यास सुरवात केली आहे. आमदार शीलभद्रा दत्त आणि बन्सारी मैत्य यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

खऱ्या अर्थाने सोनार बांगला करू -

डाव्या पक्षांना पश्चिम बंगालने 27 वर्षे संधी दिली. तर तृणमूल काँग्रेसला दहा वर्ष संधी दिली. भाजपाला पाच वर्षे संधी द्या, पश्चिम बंगालला खऱ्या अर्थाने सोन्याचा बांगला केल्या शिवाय राहणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

काँग्रेस सोडली तेंव्हा काय केले -

भाजप तृणमूल काँग्रेस फोडत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्याचा समाचारही शाह यांनी घेतला. जेंव्हा ममता यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. तेंव्हा त्यांनी काय केले, असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने ममता यांना केला.

शाह यांचा प. बंगाल दौरा -

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी बंगालमधील दौरे वाढवले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह यांनी मिशन बंगालचे लक्ष्य निश्चित केले. ममता बॅनर्जीही यावेळी भाजपाला गांभीर्याने घेत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - दीदीं’ना हादरा; तृणमूलच्या बड्या नेत्याने केला भाजपामध्ये प्रवेश

Last Updated : Dec 19, 2020, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.