ETV Bharat / bharat

लॉकडाऊन : पोलिसांनी रोखल्यानंतर १० हजार लोकांचा महामार्गावर डेरा, पोलीस प्रशासन गांगरलं

author img

By

Published : Mar 31, 2020, 9:56 AM IST

लॉकडाऊनमुळे, दिल्लीतील रोजंदारीवर काम करणारे उत्तर प्रदेशचे मजूर आपापल्या गावी जाण्यास पायी निघाले. मंगळवारी, तब्बल १० हजार मजूर सैया बॉर्डर पोहोचले. तेव्हा मजूरांची संख्या पाहून धौलपूर पोलिसांसह जिल्हा प्रशासन गांगरले.

A batch of about 10 thousand laborers arrived at the Saiya border in Uttar Pradesh in Dhaulpur
लॉकडाऊन : पोलिसांनी रोखल्यानंतर १० हजार लोकांचा महामार्गावर डेरा, पोलीस प्रशासन गांगरलं

धौलपूर - कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे रोजंदारीवर काम करण्याऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा दिल्लीतील रोजंदारीवर काम करणारे उत्तर प्रदेशचे मजूर आपापल्या गावी जाण्यास पायी निघाले. मंगळवारी, तब्बल १० हजार मजूर सैया बॉर्डर पोहोचले. तेव्हा मजूरांची संख्या पाहून धौलपूर पोलिसांसह जिल्हा प्रशासन गांगरले.

पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव केल्याने, त्या मजूरांनी आजूबाजूच्या शेत आणि महामार्गावर आपला डेरा टाकला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राकेश जयस्वाल घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महामार्गावर थांबलेल्या लोकांना बाजूला केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लॉकडाऊन : पोलिसांनी रोखल्यानंतर १० हजार लोकांचा महामार्गावर डेरा...

रात्री उशिरा पोलीस प्रशासनाने त्या मजूरांना महामार्गावरुन जाणाऱ्या ट्रॅकमधून पुढे पाठवल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. दिल्ली, नोएडा, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातून आलेल्या मजूरांवर सॅनिटायजरच्या नावाखाली फायर ब्रिगेडच्या माध्यमातून केमिकल फवारण्यात आले होते. यात अनेक मजुरांच्या डोळ्यांना इजा झाली.

हेही वाचा - VIDEO : कोरोनापासून बचावासाठी लोकांच्या जीवाशी खेळ; लोकांना घातली केमिकलने अंघोळ..

हेही वाचा - दिल्लीतील आठ वर्षीय मुलीने पिगी बँकेतील रक्कम पीएम रिलीफ केयरला केली दान

धौलपूर - कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे रोजंदारीवर काम करण्याऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा दिल्लीतील रोजंदारीवर काम करणारे उत्तर प्रदेशचे मजूर आपापल्या गावी जाण्यास पायी निघाले. मंगळवारी, तब्बल १० हजार मजूर सैया बॉर्डर पोहोचले. तेव्हा मजूरांची संख्या पाहून धौलपूर पोलिसांसह जिल्हा प्रशासन गांगरले.

पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव केल्याने, त्या मजूरांनी आजूबाजूच्या शेत आणि महामार्गावर आपला डेरा टाकला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राकेश जयस्वाल घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महामार्गावर थांबलेल्या लोकांना बाजूला केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लॉकडाऊन : पोलिसांनी रोखल्यानंतर १० हजार लोकांचा महामार्गावर डेरा...

रात्री उशिरा पोलीस प्रशासनाने त्या मजूरांना महामार्गावरुन जाणाऱ्या ट्रॅकमधून पुढे पाठवल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. दिल्ली, नोएडा, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातून आलेल्या मजूरांवर सॅनिटायजरच्या नावाखाली फायर ब्रिगेडच्या माध्यमातून केमिकल फवारण्यात आले होते. यात अनेक मजुरांच्या डोळ्यांना इजा झाली.

हेही वाचा - VIDEO : कोरोनापासून बचावासाठी लोकांच्या जीवाशी खेळ; लोकांना घातली केमिकलने अंघोळ..

हेही वाचा - दिल्लीतील आठ वर्षीय मुलीने पिगी बँकेतील रक्कम पीएम रिलीफ केयरला केली दान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.