ETV Bharat / bharat

बेळगावात विवाहित तरुणीची प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या

author img

By

Published : Jun 4, 2021, 2:36 PM IST

Updated : Jun 4, 2021, 3:10 PM IST

सिंदोगी येथील पंचम्म कणवी (२५) व सक्कुबाई करीगार हे दोघे मागील पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. ही बाब त्यांनी आपल्या घरच्यांना देखील सांगितली होती. मात्र घरच्यांनी त्यांच्या प्रेमविवाहाला परवानगी दिली नव्हती. ते जसे होईल तसे आपले प्रेमसंबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

गळफास घेऊन आत्महत्या
गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव (कर्नाटक) - येथील सावदत्ती तालुक्यातील सिंदोगी या गावात एका प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम

बेळगावात प्रेमीयुगालाची गळफास घेऊन आत्महत्या

सिंदोगी येथील पंचम्म कणवी (२५) व सक्कुबाई करीगार हे दोघे मागील पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. ही बाब त्यांनी आपल्या घरच्यांना देखील सांगितली होती. मात्र घरच्यांनी त्यांच्या प्रेमविवाहाला परवानगी दिली नव्हती. ते जसे होईल तसे आपले प्रेमसंबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

लग्नानंतरही प्रेमसंबंध चालूच

दरम्यान मागील वर्षी पंचम्म याचा विवाह झाला. त्याने लग्नानंतरही सक्कुबाई सोबतचे आपले प्रेमसंबंध चालूच ठेवले होते. त्यानंतर मागील महिन्यात सक्कुबाई हिचाही विवाह झाला. मात्र विवाह झाल्यानंतरही सक्कुबाई ही आपल्या सासरी नांदायला जात नव्हती. ती माहेरीच राहत होती. दरम्यान तिला पती व सासरच्यांकडून सासरी येण्याचे बोलावणे येऊ लागले. ही बाब सक्कुबाई हिने प्रियकर पंचम्म याला सांगितली. आणि त्या दोघांनी कुटुंबीय आपल्या प्रेमाला समजत नसल्याने ३ जून रोजी पहाटे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बेळगाव (कर्नाटक) - येथील सावदत्ती तालुक्यातील सिंदोगी या गावात एका प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम

बेळगावात प्रेमीयुगालाची गळफास घेऊन आत्महत्या

सिंदोगी येथील पंचम्म कणवी (२५) व सक्कुबाई करीगार हे दोघे मागील पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. ही बाब त्यांनी आपल्या घरच्यांना देखील सांगितली होती. मात्र घरच्यांनी त्यांच्या प्रेमविवाहाला परवानगी दिली नव्हती. ते जसे होईल तसे आपले प्रेमसंबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

लग्नानंतरही प्रेमसंबंध चालूच

दरम्यान मागील वर्षी पंचम्म याचा विवाह झाला. त्याने लग्नानंतरही सक्कुबाई सोबतचे आपले प्रेमसंबंध चालूच ठेवले होते. त्यानंतर मागील महिन्यात सक्कुबाई हिचाही विवाह झाला. मात्र विवाह झाल्यानंतरही सक्कुबाई ही आपल्या सासरी नांदायला जात नव्हती. ती माहेरीच राहत होती. दरम्यान तिला पती व सासरच्यांकडून सासरी येण्याचे बोलावणे येऊ लागले. ही बाब सक्कुबाई हिने प्रियकर पंचम्म याला सांगितली. आणि त्या दोघांनी कुटुंबीय आपल्या प्रेमाला समजत नसल्याने ३ जून रोजी पहाटे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Last Updated : Jun 4, 2021, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.