महाराष्ट्र

maharashtra

विजय शिवतारे नरमले; अजित पवारांच्या वादावर म्हणाले, राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो! - Vijay Shivtare on backfoot

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 6:50 PM IST

Vijay Shivtare on backfoot : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली आहे. लोकसभा निडवणुका जाहीर होताच (Baramati Lok Sabha) बारामती लोकसभा मतदारसंघ जोरदार चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बदला घ्यायचा म्हणत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आपण बारामतीतून लोकसभा लढवणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर शिवतारे-पवार वाद पुन्हा एकदा समोर आला. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्यस्थी करत शिवतारे-पवार वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना शिवतारे यांनी वरिल प्रतिक्रिया दिली आहे.

पवार-शिवतारे
पवार-शिवतारे

शिवतारे

पुणे : Vijay Shivtare on backfoot: राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो. आम्ही जनतेसाठी लढतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी दिली आहे. (Shivtare Pawar debate) बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष लढणार असा ठाम निर्णय घेणारे विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर माघार घेतल्याचं चित्र आहे. मात्र, विजय शिवतारे सासवड येथे सर्व समर्थकांची बैठक घेणार असून, त्यानंतर निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी आज पुण्यात घेतली आहे.

प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विजय शिवतारे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत अडीच तास बैठक झाली. मतदार संघातील लोकांच्या भावना या मी तिघांना कळवल्या आहेत. उद्या मी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये काय झालं त्याची सगळी माहिती उद्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे असंही ते म्हणाले आहेत.

कार्यकर्त्यांची बैठक घेणार : पवार विरोधी पाच लाख मतदार आहेत असं तुम्ही म्हणाला आणि पवारांचा काय हा सातबारा नाही असंही म्हणाला होतात. त्यावर तुमची भूमिका काय? असं विचारलं असता विजय शिवतारे म्हणाले, राजकारणात आम्ही स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी लढत असतो. उद्या बैठक करून परत मुंबईला जाईन. राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असंही ते म्हणाले. तसंच, प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून त्यांचं मत काय आहे हे जाणून घेणार आहे. कार्यकर्त्यांचं मत नकारात्मक असेल किंवा सकारात्मक असेल ते पाहून पुढील निर्णय घेणार असंही ते म्हणाले.

हात जोडले : जनतेचा आवाज ऐकून मी बारामती लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला होता. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसंच, सूर नरमाईचा दिसतो असं विचारताच, "आता जास्त बोललं की तुम्ही परत तेच शब्द दाखवणार" असं शिवतारे म्हणाले. तसंच, बैठकीत अजित पवारांनी काय सांगितलं यावर बोलताना शिवतारेंनी हात जोडले.

वाद मिटवण्याचा प्रयत्न : अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या पत्नी या बारामती लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत हे जवळपास निश्चित आहे. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना या पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी बंड केल्याने त्याचा फटका अजित पवार यांच्या पक्षाला बसू शकतो अशी स्थिती आहे. त्यामुळे महायुतीतील हा वाद मिटणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत अजित पवार आणि शिवतारे यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा :

1खासदार श्रीनिवास पाटील यांची निवडणुकीतून माघार, शरद पवारांनी निवडणूक लढवण्याची मागणी - Lok Sabha elections

2ऐन निवडणुकीच्या काळात आयकर विभागाची कॉंग्रेसला नोटीस; ठोठावला 1700 कोटींचा दंड - Income Tax Notice Congress

3प्रेमविवाहाला कथित मदत करणं बेतलं जिवावर, काकानंच पुतण्याच्या अंगावर घातली फिल्मीस्टाईलनं जीप, चारवेळा चिरडून केली हत्या - Sambhajinagar Murder

ABOUT THE AUTHOR

...view details