महाराष्ट्र

maharashtra

पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न करताना ट्रॉली उलटल्यानं एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता - Tractor Trolley Overturned Kolhapur

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 10:07 PM IST

Tractor Trolley Overturned Kolhapur : पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी 8 जण ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन गेले. यावेळी दोघे जण बेपत्ता झाले आहेत. यात अकिवाट गावच्या सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यात आज (2 ऑगस्ट) घडली.

Tractor Trolley Overturned Kolhapur
ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्यानंतर पुरात वाहून गेलेल्यांचा शोध घेताना एनडीआरएफ पथक (ETV Bharat Reporter)

कोल्हापूरTractor Trolley Overturned Kolhapur :कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील अकिवाट-बस्तवाड दरम्यान‌ असलेल्या ओढ्यात पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन गेलेले 8 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. यापैकी 5 जण पुराच्या पाण्यातून पोहत नदी काठी पोहोचले. तर दोघांचा अजूनही शोध सुरू आहे. अतिवाट गावचे सरपंच पती सुहास पाटील यांचा पाण्यात बुडून अंत झाल्याची दुर्घटना घडली आहे. 'एनडीआरएफ'च्या जवानांकडून बुडालेल्या दोघा जणांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.

अकिवाट-बस्तवाड दरम्यान‌ घडलेल्या दुर्घटनेतील व्यक्तींना कोणती मदत केली गेली याविषयी सांगताना पालकमंत्री हसन मुश्रीफ (ETV Bharat Reporter)

ट्रॅक्टरचं चाक खड्ड्यात अडकलं :शिरोळ तालुक्यातील अकिवाट-बस्तवाड मार्गावर पाण्याची मोटर चालू करण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर उलटल्याची घटना दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेत सहा जण बचावले होते. यातील एक जण अत्यावस्थ परिस्थितीत असल्यानं त्यांना उपचारासाठी दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला. अद्याप माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार आणि अण्णासाहेब हासुरे हे दोघेजण बेपत्ता आहेत.

खड्ड्यात चाक अडकलं, ट्रॅक्टर पलटी :ओढ्यावरून जाताना ट्रॅक्टरचं चाक खड्ड्यात अडकल्यानं ट्रॉलीसह ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरमधून उड्या टाकून या अपघातातून बचावलेले अकिवाट येथील श्रेणिक चौगुले, रोहीदास माने, खिद्रापूर येथील केळी व्यापारी अंगद मोहीते, अझहर आलासे, प्रदीप पाटील यांनी सांगितलेला घटनाक्रम अंगावर शहारे आणणारा होता. अपघातातून बचावलेल्यांना दत्तवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ घटनास्थळी :शिरोळ तालुक्यातील अकिवाट बस्तवडे ओढ्यादरम्यान घडलेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुहास पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तर उपचारासाठी दाखल केलेल्या अपघातग्रस्तांची विचारपूस केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ यांनी मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ 4 लाखांची मदत जाहीर केली.

हेही वाचा:

  1. Student Vehicle Accident : दोधेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी; अपघातात एक विद्यार्थी ठार तर, 20 ते 22 विद्यार्थी जखमी
  2. Uncle Nephew Death in Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरचा भीषण अपघात, काका-पुतणे जागीच ठार
  3. वऱ्हाडाचा ट्रॅक्टर पलटी होऊन नवरदेवासह सहा जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details