महाराष्ट्र

maharashtra

"निवडून आल्यावर विरोधात राहीन, पण जातीयवादी शक्तींबरोबर जाणार नाही", हितेंद्र ठाकूर यांचा निर्णय - Hitendra Thakur Determination

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 6:40 PM IST

Hitendra Thakur Determination : पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील हे यंदा पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारसभेत बोलताना हितेंद्र ठाकूर भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावत म्हणाले की, "आपला पक्ष लोकसभेवर निवडून आला तर विरोधी पक्ष म्हणून काम करणं पसंत करेल; परंतु कधीही जातियवादी शक्तींसोबत जाणार नाही."

Hitendra Thakur Determination
हितेंद्र ठाकूर (Reporter)

पालघर लोकसभा निवडणुकीतील जातीय शक्तींविरोधात टीका करताना आमदार हितेंद्र ठाकूर (Reporter)

मुंबईHitendra Thakur Determination :पालघर लोकसभा मतदारसंघातील अतिशय चुरशीच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडू लागल्या आहेत. याबाबत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे आमदार राजेश पाटील त्यांच्या विरोधात उबाठा गटाच्या भारती कामडी तसंच महायुतीचे डॉ. हेमंत सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करून भाजपाने पालघर जिल्ह्याचे माजी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे.


ही बिरुदं पाहून लाज वाटते - हितेंद्र ठाकुर :प्रचारादरम्यान जी भाषा वापरली जात आहे. ज्या पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत याकडे आपण कसं बघता असं विचारलं असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, राजकारणाला आता काही अर्थ उरला नाही. जी काही बिरुदं लावली जात आहेत ती पाहता खरोखर लाज वाटते. कोण कुठल्या पक्षात आज कुठे? उद्या कुठे? काही सांगता येत नाही. गिधाड, सीयार, मेंढक ही प्रचाराची भाषा. सुसंस्कृतपणा राहिलेला नाही. जे कालपर्यंत विधान परिषद, राज्यसभेसाठी माझ्या येथे लाईन लावत होते. ते सर्व आज माझ्या विरोधामध्ये एकवटले आहेत. तुमची भाषा कुठली? तुमचा सुसंस्कृतपणा कुठे गेला? ३५ वर्ष राजकारणात आहे. सतत भाजपा-शिवसेनेशी लढत आलोय. गरज कधी कोणालाही लागू शकते. जिंकून येण्यासाठी कोणा कोणाला कामाला लावले आहे. आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी, सीईओ, कलेक्टर ही काय घरची गोष्ट आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कंत्राटदारांनी कोणती कामे केली ते दाखवा? :ठेकेदारांकडून २०-२० कोटी जमा करण्याचे आदेश पालघरच्या पालकमंत्र्यांनी दिले आहेत, असा थेट आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना ते बोलले की, आपल्याकडे याचा पुरावा आहे. फन हॉटेलमध्ये इतके दिवस रूम कशासाठी बुक करण्यात आले आहेत. तिथे कॉन्ट्रॅक्टर कशाला बोलवता? कुठली कामे झाली आहे ती दाखवा. त्या हॉटेलमध्ये कोणाच्या नावाने रूम बुक आहेत आणि कोण राहतं याची चौकशी करा. 'प्रधानमंत्री हर घर जल जीवन योजना' याने कधीही तुमच्या घरात पाणी पोहोचणार नाही. विवेक पंडित साहेबांनी याबाबत जे सांगितलं आहे की, पंतप्रधानांची योजना चांगली आहे; परंतु राज्य सरकार ती राबवण्यात अपयशी ठरलं आहे, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. तुमच्या घरात पाणी पोहोचलं की नाही, हे बघायला मोदी साहेब येणार आहेत का? हे काम कुणाचं आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पालकमंत्री म्हणतात शिट्टी फक्त वसईपुरती :गल्लीतील शिट्टी दिल्लीमध्ये वाजणार. याला मत म्हणजे, मोदींना मत यासाठी कोणाही बैलाला उभं केलं आहे. अमित शाह म्हणतात ४०० एमएलडी पाणी वसई-विरारला दिले. हे म्हणजे जुन्याकाळी लोक सांगायचे देवीची केस दाखवा एक हजार रुपये मिळवा. त्या प्रकारे आता मी अमित शाह यांना सांगतो ४०० एमएलडी पाणी दाखवा आणि आम्हा तिन्ही आमदारांचे राजीनामे घ्या. २०१४ आणि २०१९ मध्ये जुमलेबाजी करून थापा मारून खासदार निवडून आणले. पंधरा लाख कुठे गेले. आता लोक भूलथापांना बळी पडणार नाहीत. निवडून आल्यानंतर मी कधीही जातीयवादी शक्तीबरोबर जाणार नाही. विरोधात राहीन, असं ठाम मत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मांडलं.


राजेंद्र गावित यांचा पत्ता कट केला :राजेंद्र गावित यांचे पाच फेरे पूर्ण झाले आहेत. अजून त्यांचे दोन फेरे पूर्ण व्हायचे बाकी आहेत. माझ्याकडेसुद्धा आले होते; परंतु मी त्यांना नकार दिला. नाहीतर त्यांचा एक फेरा अजून वाढला असता. आम्ही योग्य उमेदवार निवडला आहे. आमच्या उमेदवाराला जिल्ह्याची संपूर्ण जाण आहे. अनेक विकासकामं त्यांनी त्यांच्या मतदारसंघात केली आहेत. 2009 ते 2014 या दरम्यान आमचे खासदार बळीराम जाधव यांनी जी काही विकास कामं केली, त्यानंतर मागील १० वर्षांत कुठलीही विकासकामं या जिल्ह्यात झालेली नाहीत. आमचा खासदार भरघोस मतांनी निवडून येईल असा विश्वास आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला.


हेही वाचा:

  1. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : आता मुंबई गुन्हे शाखा करणार भावेश भिंडेचा 'कसून' तपास, प्रकरण वर्ग - Ghatkopar Hoarding Collapse
  2. शिरुर लोकसभेच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रुमच्या सीसीटीव्हीची स्क्रिन 24 तास बंद? जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले... - Lok Sabha Election
  3. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा जातीची गोळाबेरीज; कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीचं वर्चस्व? - Caste Equations In Mumbai

ABOUT THE AUTHOR

...view details