साखर क्षेत्रात महाराष्ट्राला पुन्हा अव्वल क्रमांकावर आणायचे... पाहा काय म्हणाले शरद पवार
आपल्याला आता आधुनिकतेची कास धरावी लागणार आहे. महाराष्ट्र एकेकाळी साखर क्षेत्रात क्रमांक एकला होता, आज उत्तर प्रदेश क्रमांक एकवर आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आपण जसे काम करतो तसेच काम संस्थेच्या शाखांमध्ये आपल्याला करावे लागेल, असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले.