ठाणेरामायण काळापासुन आदिवासी समाजाचे देशाच्या प्रत्येक वाटचालीत योगदान असून हनुमान सुग्रीव शबरी यांच्यासह असंख्य अदिवासी बांधवांनी प्रभूराम यांच्यासोबत राहून त्यांना साथ दिली शिवाय महाराणा राणाप्रताप यांच्या हलदीघाटच्या लढाईत आदिवासांनी साथ दिल्याने त्यांचा विजय झाला होता पण हे सर्व आपल्याला ठाऊक नाही त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे त्यामुळे तुमच्या मूलभूत हक्कासाठी कोणाकडेही भीक मागण्याची गरज नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amrita Fadnavis यांनी भिवंडीत केले श्रमजीवी संघटनेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे स्वातंत्र्योत्सव पार पडला या कार्यक्रमाला अमृता फडणवीस प्रमुख अतिथी होत्या
'हजारो आदिवसी बांधव स्वातंत्र्याच्या प्रकाशापासून वंचित' :श्रमजीवी संघटनेला स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या प्रत्येक क्रांतिकारकाचा अभिमान आहे. गांधीजी, भगतसिंग, राजगुरू, राघोजी भांगरा, नाग्या कातकरी असो वा सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर असो सगळेच क्रांतिकारक आम्हाला वंदनीय आहेत. म्हणूनच गेली चार दशक संघटना स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करत आहे. आज आलेले हजारो बांधव स्वातंत्र्याच्या प्रकाशापासून वंचित असलेले देशवासी आहे. मात्र तरीही तिरंगा आणि त्यामागचा त्याग त्यांना ज्ञात आहे. संघटना स्वातंत्र्याची किरण आदिवासी गरीब दुर्बल बांधवांच्या घरात, झोपडीत पोहचावी म्हणून लढत असलेल्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईतील या सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती आणि त्याग केलेल्या विरांना दिलेली ही मानवंदना आहे असे यावेळी संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) विवेक पंडित यांनी सांगितले.