महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

40 वर्षापासूनचा पाणी प्रश्न मिटणार, भटुंबरे गावात पेयजल योजनेचा शुभारंभ

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे (विठ्ठलवाडी विसावा) येथील गावामध्ये मागील अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई होती.

By

Published : Jul 22, 2019, 10:02 PM IST

40 वर्षापासूनचा पाणी प्रश्न मिटणार, भटुंबरे गावात पेयजल योजनेचा शुभारंभ

सोलापूर- माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्या प्रयत्नाने भटुंबरे (विठ्ठलवाडी विसावा) येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी 42 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांचा गेल्या 40 वर्षांपासूनचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे (विठ्ठलवाडी विसावा) येथील गावामध्ये मागील अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. त्यामुळे गावातील लोकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. त्यामुळे येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत बांधण्यात पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 42 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

40 वर्षापासूनचा पाणी प्रश्न मिटणार, भटुंबरे गावात पेयजल योजनेचा शुभारंभ

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत भटुंबरे गावठाण येथे 50 हजार लिटर क्षमतेची तर विठ्ठलवाडी विसावा येथे 60 हजार लिटर क्षमतेची अशा 2 पाण्याच्या टाक्या मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच नविन 3 किलोमीटर अंतराची पाईपलाईनची योजनाही मंजूर करण्यात आली आहे. या पाण्याचे टाकीचे काम लवकर पूर्ण व्हावे. त्याबरोबरच पाण्याच्या टाकीची मागील 40 वर्षापासून असलेली मागणी पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन माढा तालुक्याचे आमदार बबन शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनाजी घाडगे, ग्रमपंचायत सदस्य छगन कांबळे आबा जाधव, तानाजी खटके, नाना पनासे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details