रत्नागिरीच्या अथर्व भिडेने दहावीप्रमाणेच बारावीतही मिळविले उज्जवल यश !
रत्नागिरीतल्या अथर्व भिडेने दहावी प्रमाणेच बारावीमध्ये देखील कोकण बोर्डात उज्जवल यश संपादित केले. त्याने विज्ञान शाखेतून 96.46 टक्के गुण मिळवले असून या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.आई-बाबांकडून मानसिक बळ मिळाल्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो, असे तो म्हणाला आहे.
रत्नागिरी - नुकताचं बारावीचा निकाला लागला आहे. यावर्षीही कोकण बोर्डाने निकालात बाजी मारली. रत्नागिरीतल्या अथर्व भिडेने दहावी प्रमाणेच बारावीमध्ये देखील कोकण बोर्डात उज्जवल यश संपादित केले. त्याने विज्ञान शाखेतून 96.46 टक्के गुण मिळवले असून या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अथर्व भिडे हा अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. अथर्वला 10 वीच्या परीक्षेत 100 टक्के मार्क मिळाले होते. तर अभ्यासात नियमितपणा ठेवत त्याने बारावीमध्येही विज्ञान शाखेतून 650 पैकी 627 गुण मिळवले आहेत.
त्याला इंग्रजीमध्ये 91, फिजिक्समध्ये 92, केमिस्ट्रीमध्ये 95, मँथ्समध्ये 99, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 200 तर पर्यावरणमध्ये 50 गुण मिळाले आहेत.
अर्थवने आपल्या या यशाचं श्रेय आई-बाबा, शिक्षक यांना दिले आहे. आई-बाबांकडून मानसिक बळ मिळाल्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो, असे तो म्हणाला आहे.