महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 11, 2021, 1:39 PM IST

ETV Bharat / state

पुणे-बंगळूर महामार्गावर एकापाठोपाठ पाच अपघात; चार ठार, आठ जखमी

Intro:Puneपुणे-बंगळूर महामार्गावर एकापाठोपाठ पाच अपघात,चार ठार, आठ जखमीअपघातग्रस्त जागेची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीलाही कंटेनरने चिरडले

पुणे-बंगळूर महामार्गावर एकापाठोपाठ पाच अपघात
पुणे-बंगळूर महामार्गावर एकापाठोपाठ पाच अपघात

पुणे -पुणेकरांसाठी आज सोमवार घातवार ठरला आहे. आज पहाटेपासून पुणे-बंगळूर महामार्गावर एका पाठोपाठ एक असे तब्बल पाच विचित्र अपघात झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दुर्दैवी म्हणजे अपघातग्रस्त ठिकाणाची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला देखील अपघात झाला आहे. या अपघातांच्या मालिकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जण जखमी झाले आहेत.

पुणे-बंगळूर महामार्गावर एकापाठोपाठ पाच अपघात

पोलिसांच्या गाडीला अपघात-

अपघातग्रस्त जागेची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने जोराची धडक दिली. धडक इतकी भयानक होती की यामध्ये पोलिसांच्या महिंद्रा गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. तर दुसरा अपघातामध्ये नवीन कात्रज बोगदा म्हणून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणखी एका कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोर असणाऱ्या चार वाहनांना जोराची धडक दिली. यामध्ये एक रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा पार चुराडा झाला. या अपघातात सहा महिन्याच्या मुलासह तिघेजण जखमी झाले आहेत. जखमी मध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कात्रज बोगद्याजवळच्या अपघातात दोन ठार; तीन जखमी

आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कात्रज बोगद्या कडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका ट्रकला दुसऱ्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये समोरील ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात झाला असतानाच येथून काही मीटर अंतरावर स्पेअर पार्टची वाहतूक करणारा आयशर कंटेनर उलटल्याची घटना घडली आहे. या आयशर कंटेनरला दुसरा ट्रक घासून गेल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.

किवळे हद्दीत भीषण अपघात-

तर मुंबई- बंगळुरू महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या खासगी बसने टेम्पोला भीषण धडक दिली. यात, एकाचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. बजरंग गायकवाड (रा.लातूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रावेत पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.

आज सकाळपासून सुरू असलेल्या या अपघाताच्या मालिकेमुळे मुंबई-बंगळूर महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. अग्निशमन दलाचे जवान, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाचे पोलीस अधिक कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा केला.




ABOUT THE AUTHOR

...view details