पालघर - शारदीय नवरात्रोत्सवात विरार आगाशी येथील विष्णूमंदिरात गेली एक्कावन्न वर्षे अष्टमीला तांदळाच्या पिठापासून महालक्ष्मी देवीची मूर्ती साकारण्यात येते. पंचक्रोशीतील महिला मध्यरात्रीपर्यंत या देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतात.
हेही वाचा - 'आरे'मधील झाडे रात्री तोडली, 'मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'
आगाशी येथील सव्वाशे वर्षे जून्या विष्णू मंदिरात अष्टमीला संध्याकाळी तांदळाच्या पिठापासून मूर्तीचा मुखवठा साकारण्याची परंपरा आहे. साडी-चोळी नेसवून देवीची विधीवत पूजा केली जाते. खणा-नारळाची ओटी भरल्यानंतर देवीचे दर्शन भाविकांना देण्यास सुरुवात करण्यात येते. रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात.