नंदुरबार - मागील तीन वर्षापासून शेतातून कुठल्या प्रकारचे उत्पन्न निघत नसल्याने, त्याचबरोबर शेतात बियाणे व फवारणीसाठी उचललेल्या कर्जाचा बोजा वाढत असल्याने, नैराश्यासह कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेतकर्याने आपल्या शेतात फवारणीचे औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथील सदाशिव ओंकार पाटील (वय 44) यांनी तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली. संततधार झालेल्या पावसातून कपाशी काही प्रमाणात वाचविली. मात्र, अवकाळी पाऊस झाल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याचे दिसून आल्यानंतर सदाशिव पाटील हे खचून गेले होते. तीन वर्षापूर्वी मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज त्याचबरोबर शेतातून पाहिजे तेवढे उत्पन्न निघणार नाही. त्याचबरोबर कर्जाचे डोंगर वाढतच राहणार आहे. कापूस पिकातून पाहिजे तेवढे उत्पन्न निघणार नसल्याचे त्यांना दिसून आले. त्या नैराश्यासह कर्ज बाजारीपणा कंटाळून सदाशिव ओंकार पाटील यांनी कपाशीवर फवारणीचे औषध प्राशन करुन आत्महत्या केली.