महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 21, 2021, 12:57 PM IST

Updated : Feb 21, 2021, 3:16 PM IST

ETV Bharat / state

नागपुरात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद; वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात ठिकठिकाणी पुन्हा संचारबंदी लावली जात आहे.

Nagpur Municipal Corporation
नागपूर महानगरपालिका

नागपूर - कोरोनाचे वाढते संकट पाहता शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.
नववी आणि दहावी या वर्गांच्या परीक्षा घेणे गरजेचे असल्याने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. खासगी शिकवणी वर्गांमध्येही कडक तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवली जाणार -

आतापर्यंत हवी तशी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नव्हती, अशी खंत महापौरांनी व्यक्त केली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आशा वर्कर सोबत बोलणी सुरू असून लवकरच टीम वाढवली जाईल. कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या घराच्या चारही बाजूंना असलेल्या 10 घरांमधील लोकांची चाचणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी देखील त्यांची जबाबदारी ओळखून विना मास्क खरेदीला येणाऱ्यांना ग्राहकांना दुकानात घेऊ नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

पुण्यात संचारबंदी -

दरम्यान, आज पुणे शहरात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Last Updated : Feb 21, 2021, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details