महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक एमएस दिन : २५-३५ वर्षे वयोगटातील तरुणाईमध्ये आढळणारा 'हा' आजार; जाणून घ्या 'लक्षणे'

एमएस आजारामध्ये रुग्णाच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम होत असोत. त्यामुळे मज्जातंतूचे नुकसान होत असते.

By

Published : May 30, 2019, 8:18 AM IST

सौजन्य - विकिपीडिया

मुंबई -तरुणाईमध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) हा आजार फोफावत चालला आहे. या आजाराच्या रुग्णाला उपचार मिळावे यासाठी मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (एमएसएसआय) या संघटनेने पुढाकार घेतला आहे. ३० मे रोजी जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस साजरा केला जातो. त्यानिमित्त बुधवारी मुंबई पत्रकार संघ येथे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आजाराबद्दल माहिती देताना मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या सदस्या

निदान, नवीन औषधे आणि उपचार यामुळे एमएस आजार काही प्रमाणात बरा होऊ शकतो. या आजारामध्ये केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम होत असोत. त्यामुळे मज्जातंतूचे नुकसान होत असते. या आजाराचे प्रमाण जास्तीत जास्त २५ -३५ वर्ष वयोगटातील तरुणाईमध्ये पाहायला मिळते. तसेच मुलांपेक्षा मुलींना जास्त त्रास होत असतो.

आजाराची लक्षणे -

  1. नजर धूसर होणे
  2. लघवीवर नियंत्रण न राहणे
  3. थकवा
  4. गरगरणे
  5. बोलायला त्रास होणे
  6. चालताना त्रास होणे
  7. कुठलीही गोष्ट समजून घेण्याची क्षमता लोप पावणे

कारणे -
अनुवांशिक आणि पर्यावरणीय कारणांमुळे एमएसची लागण होऊ शकते. गेल्या काही काळामध्ये एमएसची लागण होण्याचा वयोगट २५- ३५ वर्षांचा राहिलेला आहे. स्त्री-पुरुषांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण १:२ इतके असल्याचे मुंबईतील जसलोक रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. एस. एम. कात्रक यांनी सांगितले.

रुग्णांची अधिक संख्येने नोंद -
भारतामध्ये सध्या १ लाख लोकांमध्ये ७-१२ लोकांना एमएसची लागण झाल्याचा अंदाज आहे. मात्र, दुर्दैवाने अद्यापही ग्रामीण भागामध्ये या रोगाचा कितपत प्रादुर्भाव आहे? याची माहिती उपलब्‍ध नाही. मात्र, न्यूरोलॉजिस्ट्समध्ये या व्याधीबाबत जागरुकता वाढली आहे. तसेच एमआरआय तपासण्यांची सोयदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये एसएसच्या रुग्णांची अधिक संख्येने नोंद होऊ लागली आहे.

लक्षणे अदृश्य असल्याने अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचण -
गेल्या २०१६ ला एमएस या व्याधीला भारताच्या अपंगत्व कायद्यामध्ये स्थान मिळाले. पण अनेकांना या गोष्टीची माहिती नाही. शिवाय एमएसची लक्षणे अदृश्य असल्याने रुग्णांना अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे अपंगत्वाचे मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एमएसमधील बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. तसेच एमएसच्या रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र मिळावे यासाठी या अधिकाऱ्यांनी रुग्णांना मदत करणे आवश्यक असल्याचे बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रीसर्च सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सतीश खाडीलकर यांनी सांगितले.

एमएस रुग्णांना ६० टक्क्याहून अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे -
एमएस व्याधीच्या रुग्णांचे आयुष्य अडथळ्यांनी भरलेले असते. पुढे काय घडणार याची कल्पनाही त्यांना नसते. या व्याधीची लक्षणे अदृश्य असल्याने कामाच्या ठिकाणी, कुटुंबात आणि सामाजिक पातळीवर त्यांना असमानतेची वागणूक दिली जाते. समाजाकडून होणाऱ्या हेटाळणीला तोंड देण्यासाठी आम्ही अशा रुग्णांचे समुपदेशन करतो. एमएसची तीव्रता मोजताना केवळ अपंगत्वाची टक्केवारी मोजणे हा एकमेव निकष ग्राह्य धरता येणार नाही. कारण हे रुग्ण अदृश्य लक्षणांना सामोरे जात असता. अपंग कल्याण आयोगाने अशा रुग्णांच्या व्यथा समजून घेणे. तसेच त्यांना ६० टक्क्याहून अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे, अशी विनंती मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details