मुंबई - राज्यात आयाराम-गयारामांचे वारे दिवसेंदिवस वेगात वाहत आहेत. यामध्ये आज (मंगळवारी) दिवसभरात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तिसरा धक्का बसला. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे जेष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसचा 'हाथ' सोडत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मंगळवारी त्यांनी दिल्ली येथे पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर उद्या (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा -आघाडीतही 'इनकमिंग'...भाजपचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश?