मुंबई- देशभरात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, धारावीत लसीकरणाचा वेग संथ आहे. हा वेग वाढविण्यासाठी धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत धारावीतल्या आरोग्य केंद्रात नागरिकांना लस दिली जाणार आहे.
जे होऊ नये तेच घडले -
मुंबईत कोरोनाने एंट्री केल्याने अनेकांची चिंता वाढली होती. मात्र, त्यानंतर जे होऊ नये तेच घडले; म्हणजेच धारावी परिसरातही कोरोनानं एन्ट्री केली. तेव्हा मुंबईकर आणि प्रशासन यांच्यापुढे कोरोना रोखण्याचे खूप मोठे आव्हान होते. कारण, धारावी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. येथे नागरिकांची खूप गर्दी असते. यानंतर धारावीतला कोरोना लवकरात लवकर आटोक्यात यावा यासाठी प्रशासनानं कंबर कसली आणि धारावीत कोरोनाला वेसण घातली.
हेही वाचा -होम क्वारंटाईन असताना अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली कशी? फडणवीसांचे शरद पवारांना ट्विट