मुंबई -भारतीय जनता पक्षाच्या निलंबित 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ( Supreme Court MLA Suspension Cancellation Decision ) मुंबई आणि नागपूरच्या विधानभवनात ( Entry in Mumbai and Nagpur Vidhan Bhavan ) प्रवेश मिळावा, यासाठी भाजप नेते आमदार आशिष शेलार ( BJP Leader and MLA Ashish Shelar ) यांनी पत्र लिहिले आहे. विधान भवन सचिवांना शेलार यांनी हे पत्र लिहिले. ( Ashish Shelar Letter to Legislative Secretary )
भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. एक वर्ष एवढा प्रदीर्घ काळासाठी आमदारांना निलंबित करता येणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या बारा आमदारांना मुंबई आणि नागपूरच्या विधान भवनात प्रवेश मिळावा. यासाठी निलंबित बारा आमदार यांच्या वतीने आशिष शेलार यांनी विधान भवन सचिवांना पत्र लिहले आहे.