मुंबई - अजित पवार हे राज्याचे नवीन (Maharashtra Political Crisis) उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली (NCP Political Crisis) आहे. मंत्रिमंडळात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलो (Eknath Shinde on NCP Crisis) आहोत.
हे नवीन सरकार नाही, शिवसेना आणि भाजप सरकार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. विकासाची कामे सुरू होती आणि विकास कामावर विश्वास ठेवणाऱ्या अजित पवारांनी सरकारला साथ दिली. मी त्यांचे आणि त्यांच्या आमदारांचे मनापासून स्वागत करतो. त्यांच्याकडे अनेक खासदार आणि आमदार आहेत जे महाराष्ट्राच्या विकासाला नक्कीच मदत करतील. डबल इंजिन असलेले हे सरकार आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणार आहे. काही लोक गुगली आणि क्लीन बोल्डबद्दल बोलत होते, पण आज सगळ्यांनी पाहिलं की कोण क्लीन बोल्ड झाले - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
ट्रिपल इंजिन सरकार -आता आमच्याकडे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. डबल इंजिनचे सरकार आता ट्रिपल इंजिन बनले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत करतो. अजित पवारांच्या अनुभवामुळे महाराष्ट्र मजबूत होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.