हिंगोली- शेतकरी दिवसेंदिवस पारंपरिक शेतीला एवढे वैतागले आहेत, की काही शेतकरी शेती विकायला निघाले आहेत. तर काही त्याच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. मात्र, टंचाईच्या काळात स्वतःला धीर देत जिल्ह्यातील काही शेतकरी लोकांच्या चुली पेटविणाऱ्या मीलूडूबिया या वृक्षाची शेती करतात. हे वृक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातच लागवड केली असल्याने या वृक्षांची वाढण्यासाठी स्पर्धा लागली आहे. वृक्षदेखील रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
हिंगोली जिल्ह्यावर दरवर्षीच पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी टंचाईला कंटाळून शेती करणेच सोडून दिले. काही शेतजमीन मक्त्याने देण्याच्या तयारीत आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यातील डीग्रस कऱ्हाळे येथील माधव किसन कऱ्हाळे आणि वैजनाथ दादाराव कऱ्हाळे या दोन शेतकरी मात्र याला अपवाद ठरले आहेत. या दोन शेतकऱ्यांनी दूरदूरष्टीचा विचार करून, एकर भर शेतात मिलूडुबिया या वृक्षाची लागवड केली. वृक्ष लातूर येथील एका नर्सरीमधून आणले. दहा बाय दहा अन् पंधरा बाय पंधरावर 302 झाडांची दोन वर्षापूर्वी 40 हजाराच्या वर खर्च आला आहे. या वृक्षांना महाराष्ट्रातील तापमान आल्हाददायक असल्याने, या वृक्षाची वाढही बऱ्यापैकी होते. जवळपास एक- एक वृक्ष 25 ते 30 फूट उंच वाढते. वृक्षाची तोड ही सहा वर्षानंतर केली जाते. एक वृक्ष एक ते दोन टनांपर्यंत जाऊन पोहोचते. कंपनी थेट शेकऱ्यांसोबत संपर्क साधते.