धुळे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचं ( Chief Minister Aknath Shinde ) मंत्रिमंडळ स्थापन होऊन राज्याचा कारभाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी आम आदमी पक्षाच्या ( Aam Aadmi Party ) वतीनं धुळ्यातील एकविरा देवीला ( Ekvira Devi ) सोमवारी साकडं घालण्यात आलं. शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन होऊन राज्याचा कारभाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी आम आदमी पक्षानं देवीला साकडं (Ekvira Devi ) घातल्यानं धुळ्यातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत . राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो हाच संदेश या आम आदमी पक्षाच्या भूमिकेच्या माध्यमातून तर द्यायचा हा प्रयत्न तर नाही ना ? असा सवाल देखील राजकीय क्षेत्रात चर्चिला जातोय .
"आप" चे एकविरा देवीला साकडे - शिंदे सरकार स्थापन होऊन २५ दिवसांचा कालावधी लोटला मात्र, मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion ) झालेला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघंच सरकारची भूमिका निभावताहेत. राज्यातील अन्नदाता अर्थात शेतकरी नैसर्गिक संकटाला तोड देतोय. अतिवृष्टीने शेती क्षेत्राचं नुकसान ( Agricultural damage due to heavy rainfall ) झालंय. बनावट खत विक्रीवर सरकारच नियंत्रण नाही, विकास कामं थांबलेली आहेत. राष्ट्रीयकृत बँकांची शेतकऱ्यांप्रती अनास्था आहे. अशा एक ना अनेक समस्यांनी राज्यातील शेतकरी, नागरिक त्रस्त झालाय असे, आम आदमी पक्षानं म्हटलंय .