बीड - तुमची साथ ही सामाजिक परिवर्तनाची नांदी असते. माझ्यासाठी 15 दिवस द्या आणि 5 वर्षे तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या. सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
हॉटेल अन्विता येथे शनिवारी बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी जयदत्त क्षारसागर बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, दिलीप गोरे, अशोक कांबळे, नाना मस्के, आशिष चव्हाण, संजय होळकर, सचिन सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध, आता लक्ष माघारीकडे
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली
बौध्द समाजाने दिलेला शब्द काळ्या दगडावरची रेघ आहे. माझे म्हणने पटत असेल तर साथ द्या, तुमची साथ ही सामाजिक परिवर्तनाची नांदी असल्याचे क्षीरसागर म्हणाले. भाजप-शिवसेना, रासप, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठी असते. दुष्काळ भूतकाळ करावयाचा आहे. मलमपट्ट्या करून भागत नाही, त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतात. समुद्राला वाहून जाणारे ६०० टीएमसी पाणी मराठवाड्यातील ११ मोठ्या तलावात सोडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. २०२२ पर्यंत एकही बेघर राहणार नाही. निराधारांना आधार, महिला सक्षमीकरण, गोरगरीबांच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, निवारा, रस्ते, पाणी या सर्व सुविधा प्राधान्याने बीड जिल्ह्यात आणण्यासाठी आपला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले. यावेळी अमोल पौळ, अमोल अहिरे, संगिता गायकवाड, बाळासाहेब काकडे, प्रियंका कामटे, राम हिरवे, कौशल्या गायकवाड, बबिता वडमारे आदिंसह पुरुष, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.