महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 11, 2021, 10:59 PM IST

ETV Bharat / state

मंत्री यशोमती ठाकूर यांचा अतिवृष्टी भागात दौरा; नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे भागाची केली पाहणी

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज नांदगाव खंडेश्वर व चांदुर रेल्वे तालुक्यातील पाहणी दरम्यान दिले. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या विविध भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी यशोमती ठाकूर यांनी केली.

Compensation Proposal Yashomati Thakur
भरपाई प्रस्ताव निर्देश यशोमती ठाकूर

अमरावती -अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज नांदगाव खंडेश्वर व चांदुर रेल्वे तालुक्यातील पाहणी दरम्यान दिले. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या विविध भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी यशोमती ठाकूर यांनी केली.

माहिती देताना मंत्री यशोमती ठाकूर

हेही वाचा -अमरावतीत बोगस बियाणे, 200 हेक्टरवरील मिर्ची खराब; शेतकऱ्यांचा कंपनी विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा

अनुदानाची रक्कम तात्काळ प्रदान करा

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावातील पाझर तलावाचे पाणी परिसरातील 32 घरांमध्ये शिरले. त्याचप्रमाणे धवळसरीच्या 5 आणि टीमटाळा येथील 3 घरांचे पावसामुळे नुकसान झाले. नुकसनग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम तात्काळ प्रदान करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण

बेबळा नदीला आलेल्या पुरामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे 5 हजार 595 हेक्टर क्षेत्रात शेतामध्ये पाणी शिरले, असा प्राथमिक अहवाल आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली.

शिवणी - रसुलापूर परिसरातील नुकसानीचे पंचनमे करा

शिवणी रसुलापूर मार्गावरील बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. 92 हेक्टर शेतजमीन खरडून निघाली आहे. याबाबतचे तात्काळ पंचनामे करून तसा अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश ठाकूर यांनी दिले. बेंबळा नदीच्या पुरामुळे शेलू नटवा येथील 40 हेक्टरवरील बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश ठाकूर यांनी संबंधितांना दिले.

चांदुर रेल्वे तालुक्यात घरांची पडझड, शेतही खरडले

चांदुर रेल्वे तालुक्यातील खोलाड नदीची पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे तालुक्यातील 180 घरांची अंशतः पडझड झाली असून 4 घरे पूर्णपणे पडली आहेत. याबाबत पंचनामा करण्याची प्रक्रिया तत्परतेने व गतीने करण्यात यावी, असे निर्देश ठाकूर यांनी संबंधितांना दिले. चांदुर रेल्वे तालुक्यातील 16 गावांतील अंदाजे 350 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले असून 20 हेक्टर जमीन खरडली आहे, अशी माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली. पंचायत समिती सभापती देशमुख, पालसखेड सरपंच आरती पारधी, उपसरपंच अमोल अडसड आदी उपस्थित होते.

पूर परिस्थिती संरक्षक उपाययोजना करण्याचे निर्देश

कवठा कडू येथील पुलाची उंची वाढविणे, भिलटेक येथे नालाड नाल्यापाशी संरक्षण भिंत उभारण्यात यावी, असे निर्देश ठाकूर यांनी दिले. पळसखेड, कवठा कडू, दिघी या गावांतील काही भागांची पाहणी करताना पूरपरिस्थितीत संरक्षक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.

हेही वाचा -मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्यातील ८८० हेक्टरमधील पिकांची नासाडी

ABOUT THE AUTHOR

...view details