महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 26, 2020, 1:49 PM IST

ETV Bharat / sports

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

'टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना देशवासीय मनापासून समर्थन देतील', असे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.

india will be backed by cheers during tokyo 2020 olympics says president ram nath kovind
ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली - यावर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खेळांची महाकुंभ म्हणून गणना होणारी ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान जपानच्या राजधानीत होणार आहेत.

हेही वाचा -विश्वविजेत्या इंग्लडने केल्या तब्बल ५ लाख धावा!

'टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना देशवासीय मनापासून समर्थन देतील', असे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले की, पारंपारिकपणे, बर्‍याच खेळांमध्ये भारत चांगली कामगिरी करत आहे. आमच्या नवीन पिढीतील खेळाडूंनी अलिकडच्या वर्षांत अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. ऑलिम्पिक २०२० क्रीडा स्पर्धांमध्ये कोट्यवधी देशवासियांच्या शुभेच्छा आणि सामर्थ्याचे बळ खेळाडूंसोबत उपस्थित असेल.

चार वर्षातून एकदा होणाऱ्या या स्पर्धेला आता सहा महिने शिल्लक राहिले आहेत. कमीतकमी १२०-१२५ खेळाडूंचा संघ या स्पर्धेत पाठवता येऊ शकतो अशी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने अपेक्षा केली आहे. ब्राझीलची राजधानी येथे झालेल्या २०१६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने दोन पदके जिंकली होती. या वेळी भारताने अधिक चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details