महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 31, 2021, 7:32 PM IST

ETV Bharat / sitara

जावेद अख्तर मानहानी प्रकरणी न्यायालयाकडून कंगनाला दिलासा नाही

अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेले मानहानी प्रकरण ( Javed Akhtar Defamation Case ) , तसेच इतर प्रकरणांची सुनावणी स्थानांतरित करण्यासाठी कंगना रणौतने ( Kangana Ranaut ) सादर केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

जावेद अख्तर मानहानी प्रकरण
जावेद अख्तर मानहानी प्रकरण

मुंबई- गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी ( Javed Akhtar Defamation Case ) अभिनेत्री कंगना रणौतला ( Kangana Ranaut ) मुंबई सत्र न्यायालयाकडून तूर्तास तरी दिलासा मिळालेला नाही. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेले मानहानी प्रकरण, तसेच इतर प्रकरणांची सुनावणी स्थानांतरित करण्यासाठी कंगना रणौतने सादर केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

या पूर्वी किल्ला कोर्टानेही कंगना विरूद्ध जावेद अख्तर मानहानी प्रकरणाची सुनावणी इतर कोर्टात स्थानांतरित करण्याची मागणी फेटाळली होती.

कंगना विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी

जावेद अख्तर मानहानी प्रकरणी ( Javed Akhtar Defamation Case ) जावेद अख्तर यांच्याकडून अभिनेत्री कंगना रणौतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी काही आठवड्यापूर्वी करण्यात आली होती. यासंदर्भातील नवा अर्ज आज महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर दाखल करण्यात आला आहे. तसेच कंगनातर्फे प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोपही जावेद अख्तर यांच्यातर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जानेवारी रोजी होणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली', अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

काय म्हटले होते कंगनाने?

कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

हेही वाचा -कंगना रणौतच्या विरोधात आणखी एक तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ABOUT THE AUTHOR

...view details