महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शत्रू राष्ट्राचे सॅटेलाईट पाडल्याचे सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या कल्पनाशक्तीचे विशेष अभिनंदन, जयंत पाटलांचा टोला

शत्रू राष्ट्राचे सॅटेलाईट पाडल्याचे सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या कल्पनाशक्तीच्या आविष्काराचे खास अभिनंदनच केले पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. याच वेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

By

Published : Mar 29, 2019, 7:52 PM IST

जयंत पाटील

सांगली - स्वतःचे सॅटेलाईट पाडले असताना, शत्रू राष्ट्राचे सॅटेलाईट पाडल्याचे सांगणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या कल्पनाशक्तीच्या आविष्काराचे खास अभिनंदनच केले पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री बनण्याची अभिलाषा चंद्रकांत पाटील बाळगत असून विद्वान चंद्रकांत पाटील यांच्या बद्दल अधिक बोलायची गरज नाही, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

चंद्रकात पाटील भाजपचे राज्यातील २ नंबरचे नेते त्यांना मुख्यमंत्री बनण्याची अभिलाषा

वसंतदादा घराण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वाट लावली, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या आरोपाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे नेते जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भारताने अंतराळामधील उपग्रह क्षेपणास्त्र पाडण्याची यशस्वी चाचणी केली. चंद्रकांत पाटील यांनी भारताने शत्रू राष्ट्राचे उपग्रह क्षेपणास्त्राने पाडले आणि ते पाकिस्तानचे आहे की चीनचे आहे? ते कळायचे आहे, असे विधान केले होते. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातील भाजप मधील २ नंबरचे नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री बनण्याची सतत अभिलाषा दिसते आणि आपले पंतप्रधान आणि नेते यांनी काय घोषणा केली, त्यांना कळले नाही.
जगाच्या पाठीवर शत्रू राष्ट्राच्या उपग्रह पाडण्याचा उद्योग अजून तरी कोणी केला नाही. पण चंद्रकांतदादा पाटील यांच्या मनात शत्रू राष्ट्रांचे सॅटलाईट पाडण्याची मजल गेली आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीच्या अविष्काराचे खास अभिनंदन करतो, असे विद्वान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल फार बोलण्याची गरज वाटत नाही, असा खोचक टोला ही जयंत पाटील यांनी लगावला.

राज्यामध्ये आघाडीच्या २५ ते ३० जागा निवडून येतील

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यात महाआघाडीला चांगले वातावरण असून उमेदवारी अर्ज भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील बऱ्यापैकी सर्व जागांचा वाद मिटला आहे. राज्यामध्ये महाआघाडीच्या २५ ते ३० जागा निवडून येतील.

प्रकाश आंबेडकर भाजपला मदत करत आहेत

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विरोधातील दलित आणि मुस्लीम समाज हा काँग्रेस आघाडीला मत देण्याऐवजी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीला मत देण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला कोणाचा पाठिंबा आहे, ते सर्व जनतेला आता कळले आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीवर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details