पुणे - गेल्या वर्षी कोथरूड भागत रानगवा शिरला होता. पकडल्यानंतर या गव्याचा मृत्यू झाला होता. येत्या ९ डिसेंबरला या घटनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. या निमित्ताने पुण्यातील प्राणी प्रेमी आणि निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने प्रायश्चित सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तशा माहितीचे बॅनर देखील लावण्यात आले आहे.
हेही वाचा -2024 ची निवडणूक देशासाठी निर्णायक, मोदींचा पराभव न झाल्यास लोकशाही संपेल : पृथ्वीराज चव्हाण
कोथरुड भागात मागच्या वर्षी 9 डिसेंबरला रानगवा आल्याने सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली होती. सात तासांच्या थरार नाट्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले होते. परंतु, नंतर या गव्याचा मृत्यू झाला होता. गव्याला पकडताना अनेक अडचणींचा सामना वनविभागाला करावा लागला. लोकांच्या गर्दीमुळे आणि आरडाओरडामुळे गवा बिथरला आणि इतरत्र धावत होता. यात तो गंभीर जखमी देखील झाला होता. या घटनेनंतर प्राणी मित्रांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. आता या घटनेला येत्या 9 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होणार आहे. आणि त्या पर्श्वभूमीवर पुण्यातील समस्त प्राणी आणि निसर्ग मित्र मंडळाच्यावतीने प्रथम पुण्यस्मरण आयोजित करण्यात आले आहे. या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने प्रायश्चित सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात लावण्यात आलेल्या बॅनरबाबत पुण्यात सर्वत्र चर्चा आहे.