नागपूर -कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ नागपुरच्या अजनी चौकातील अमर जवान स्मारक ( Amar Jawan Memorial ) येथे माजी सैनिक संघटना 'ईवान' तर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी लष्करराचे निवृत्त सैन्य अधिकारी, जवान आणि सामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते. 23 वा कारगिल विजय दिवस ( Kargil Vijay Diwas ) देशभरात अभिमानाने साजरा करण्यात येत आहे. शेजारी राष्ट्र पाकिस्तानने घुसखोरी करत भारताच्या हद्दीत प्रवेश करून सर्वात उंच टायगर हीलवर कब्जा केला. टायगर हिलवरून पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैन्यावर हल्ला केला. त्यावेळी भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानला चोख प्रतिप्रत्युत्तर दिले.
सुमारे तीन महिने भारतीय सैनिकांनी पाकिस्तान सोबत कडवी झुंज दिल्यानंतर 26 जुलै रोजी भारतीय सैनिकांनी आजच्याच दिवशी टायगर हिल परत कब्जा मिळविला होता. या लढाईत शेकडो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. हा विजय कारगिल युद्धातील सर्व वीर जवानांना समर्पित करण्यात आला.