महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 21, 2019, 12:13 PM IST

ETV Bharat / city

पीएमसी बँक खातेदारांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे - रवींद्र वायकर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र बँकेवर निर्बंध आणल्यामुळे गुंतवणूकदारांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. बँकेने घोटाळा केला मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे.  ज्यामुळे खातेदारांना 50 हजार रूपयांपर्यंतच पैसे मिळत आहेत. यासाठी रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्र्यांसोबत चर्चा करून बँकेचे व्यवहार सुरळीत व्हावेत, अशी मागणी रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

NAGPUR
रवींद्र वायकर

नागपूर- आर्थिक गैरव्यवहारात अडकल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र बँकेवर निर्बंध आणले. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. बँकेने घोटाळा केला मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे. ही बँक सुरळीत चालावी, तसेच रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्री यांच्यासोबत चर्चा करून बँकेचे व्यवहार सुरळीत व्हावेत, अशी मागणी रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या बँकेच्या व्यवहारांत अनेक सोसायटी व नागरिकांचा यांचा पैसा अडकला आहे. बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणल्याच्या धक्क्याने 19 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयने पीएमसी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. बँकेने घोटाळा केला मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे. ज्यामुळे खातेदारांना 50 हजार रूपयांपर्यंतच पैसे मिळत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details