नागपूर - त्रिपुरा हिंसाचाराच्या (Tripura violence) पार्श्वभूमीवर अमरावती (Amravati violence) आणि राज्याच्या इतर भागात ज्या जाळपोळीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत त्याविरोधात विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) आपली भूमिका माध्यमासमोर मांडली आहे. या घटनेचा निषेध नोंदवत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन या संघटनावर प्रतिबंध आणावा अशी मागणी करणार असल्याचे विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे (Milind Parande) यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते नागपूरत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यलयात बोलत होते.
'ही कृती अयोग्य आहे'
'अमरावतीत घडलेला हा प्रकार हा कट एका अकादमी आणि इतर 6 संगठनानी घडवून आणला आहे. 'त्रिपुराच्या कथित घटनेच्या विरोधात एकत्रित येण्याचे आवाहन केले. त्यानंतर षडयंत्र रचत हिंसाचार घडविला आहे. ज्यावेळी समुदाय रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात उतरला, त्यावेळी पोलीस आणि प्रशासनाने कुठे गेले होते?' असा सवाल ही विश्व हिंदू परिषदेकडून उपस्थित करण्यात आला आहे . तेच दुसऱ्या दिवशी काही समाज बांधव रस्त्यावर उतरले असताना त्याच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडण्यात आले. ही कृती अयोग्य आहे. त्यामुळे त्या अकादमी आणि इतर संगठनांवर कठोर कारवाई करत बंदी आणावी' अशी मागणी सुद्धा विश्व हिंदू परिषदने केली आहे.
मिलिंद परांडे यांनी उपस्थित केला प्रश्न -