मुंबई - राज्यात केवळ भाजपाचे सरकार नाही म्हणून कोंडी करणे हे राष्ट्रीय एकात्मतेला आणि संसदीय लोकशाहीला धरून नाही, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र आत्मनिर्भर असल्यामुळे देशाच्या तिजोरीवर सर्वात मोठी आर्थिक भर टाकत असतो. महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल, हे आपल्या विरोधीपक्ष नेत्यांना माहीत असायला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा -भाजप नावाचे संकट दूर करायचे असेल तर ममता बॅनर्जींच्या पत्राचा विचार करावा -संजय राऊत
'महाराष्ट्र आत्मनिर्भरच'
मुंबई शहर अडीच लाख कोटींच्या वर महसूल देते, म्हणजे आम्ही आत्मनिर्भरच आहोत, असे ते म्हणाले. मात्र कोरोनाचे संकट मोठे आहे, अशावेळी केंद्राने सर्व राज्यांना विशेषत: महाराष्ट्राला मदत करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.