मुंबई -दिल्लीच्या सीमेवर सुरु असेलेले शेतकरी आंदोलन एक निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले आहे. आजचा देशव्यापी बंद आणि देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह इतर अनेक संघटना, मान्यवरांनी त्याला दिलेला एकमुखी पाठिंबा ही सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावरील संतंप्त प्रतिक्रिया असल्याचे मत सामन्याच्या अग्रलेखातून मांडण्यात आले आहे. आजच्या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, यांच्यासह देशातील प्रमुख १८ राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यांच्याव्यतिरिक्त अनेक बिगर राजकिय संघटना, संस्था, व्यक्ती, कलांवत, खेळाडू यांनी बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजचा 'हिंदुस्थान बंद' संपूर्णपणे यशस्वी होणार आणि शेतकऱ्यांचा आवाज आणखी बुलंद होणार हे नक्की, असा विश्वासही सामन्यातून दाखवण्यात आला.
सामन्याचा दावा -
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होऊन ११-१२ दिवस झाले. कडाक्याच्या थंडीत आणि कोरोनाच्या संकटातही हे आंदोलन ठाम निश्चयाने सुरू आहे. सरकार त्यांना जेवण्याची तयारी दाखवते, पण त्यांच्या न्याय्य मांगण्यांवर विचार करण्याची तयारी दाखवत नाही, असे सामन्याच्या अग्रलेखातून सांगण्यात आले. आंदोलक आणि सरकार यांच्याती चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरतात. सरकारकडून कोणतेच ठोस उत्तर मिळत नाही. त्यावर शेतकऱ्यांचा विश्वास कसा बसणार?, असा सवालही सामन्याच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला.
सरकारकडून फूट पाडण्याचे प्रयत्न -