अमरावती -संविधानाचे पालन करणे हे लोकप्रतिनिधींचे आद्यकर्तव्य आहे. अमरावती शहरात मात्र पाच-सहा दिवसांपासून लोकप्रतिनिधीच कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. केवळ आणि केवळ भांडण करणे, वाद घालiणे हाच त्यांचा उद्देश आहे. खरंतर अमरावती ही विदर्भाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरी आहे डॉ. पंजाबराव देशमुख, संत तुकडोजी महाराज , संत गाडगेबाबा यांची ही पावन भूमी आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या अमरावतीच्या. सांस्कृतिक वैभव असणाऱ्या अमरावतीच्या सांस्कृतिक दर्जाला शोभावी अशीच लोकप्रतिनिधींची वागणूक असावी, असा टोला जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur Critisize Ravi Rana ) यांनी राणा दाम्पत्यांना मारला. गत काही दिवसांपासून शहरात सुरू असणार्या घडामोडींचा संदर्भात यशोमती ठाकूर यांनी ( Amravati Yashomati Thakur Press Conference ) आज पत्रकार परिषद घेऊन शहर आणि जिल्ह्यात शांतता राहावी, असे आवाहन केले.
'छत्रपतींचा पुतळा सन्मानाने स्थापन व्हावा' -
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अमरावती शहरात स्थापन करण्यास कोणाचाही विरोध नाही. छत्रपती शिवराय हे सर्वांचेच आदर्श आणि सर्वांना आदरणीय आहेत. मात्र, कुठलाही विचार न करता आणि प्रशासकीय मान्यता न घेता राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणे हे योग्य नाही. उड्डाण पुलावरून जाणाऱ्या बसमधील एखाद्या प्रवाशाने बाहेर थुकले तर त्याचे शिंतोडे पुतळ्यावर उडतील, याची तरी जाणीव राखायला हवी. सर्वच गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींनी वागणे अपेक्षित आहे. अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यासाठी कायद्यानुसार सर्व ती कारवाई करूनच पुतळ्याची स्थापना केली जाईल, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.
'तो पुतळा फायबरचा' -
केवळ वाद घालण्याच्या निमित्ताने राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा स्थापन करण्यात आला. तो पंचधातूंचा नव्हे, तर फायबरचा पुतळा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा फायबरचा नको आहे. आम्ही तिवसा शहरात सर्व परवानगी घेऊन नियमानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला आहे. मात्र, भातकुली कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणाला बसवावा वाटला नाही. केवळ लोकांची डोकी भडकावी, याच उद्देशाने काही लोकप्रतिनिधींचे वागणे योग्य नसल्याचेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
'महापालिकेत कुठलाही प्रस्ताव नाही' -