महाराष्ट्र

maharashtra

जगावेगळं! या गावात बाळंतपणावर आहे बंदी, महिलांना सोसावा लागतो त्रास

By

Published : Nov 13, 2022, 7:44 AM IST

Updated : Nov 13, 2022, 8:11 AM IST

राजगडमधल्या सांका श्याम गावात लहान मुलाच्या पहिल्या रडण्यावर बंदी आहे त्याशिवाय तिथे आई कधीच मुलाला जन्म देऊ शकत नाही. राजगढ जिल्ह्यातील सांका श्याम गावात बाळंतपणावर बंदी ( Child Birth Ban In Sanka Shyam Village ) आहे. 700 लोकसंख्या असूनही या गावात मुले जन्माला आलेली नाहीत. मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील सांका श्याम गावातील ETV भारतचा ग्राउंड रिपोर्ट पहा.

Child Birth Ban
एक गाव जिथे मूल जन्माला घालण्यास बंदी

भोपाळ: असे गाव कधी ऐकले आहे का? जिथे खेडेगावात राहणार्‍या प्रत्येक माणसाच्या जन्माची कहाणी, शंभर वर्षापासून ते अडीच वर्षांपर्यंत, सारखीच असावी. असे गाव जिथे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत कोणीही सांगू शकत नाही की हे त्यांचे जन्मस्थान आहे. राजगड जिल्ह्यातील सांका श्याम गावाची ओळख म्हणजे एक गाव जिथे बाळंतपणावर बंदी ( Child Birth Ban In Sanka Shyam Village ) आहे. हा तिथल्या पंचायतीचा निर्णय आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या गावानेच हे बंधन तिथल्या कुटुंबावर लादले आहे. (rajgarh women curse birth baby) या बंधनाला गावातील लोक परंपरेचे नाव देतात. गावात मूल जन्माला आले तर ते जगत नाही, असाही एक समज आहे.

गावात राहणाऱ्याचा जन्म दुसऱ्या गावचा : सातशे लोकसंख्येच्या या गावात राहणारा एकही माणूस या गावाता जन्मलेला नाही. सांका गावात ऐतिहासिक मंदिर आहे. शतकानुशतके जुने सांका श्याम मंदिर पाहण्यासाठी बहुतांश पर्यटक येतात. मात्र परंपरेच्या नावाखाली गरोदर राहिल्याबरोबर महिलेला ते गाव सोडावे लागेल, अशी भावना प्रत्येक स्त्रीला भेडसावत आहे.

बैलगाडीत मुलीचा जन्म : गावात राहणाऱ्या सावित्रीबाई, त्यापैकीच एक, आपल्या मोठय़ा जावेची गोष्ट सांगतात की, त्या गरोजर होत्या ही गोष्ट समज्यावर त्यांना लगेचच बैलगाडीतून गावाबाहेर नेण्यात आले. त्यांना वेदना जाणवल्या.त्या परिस्थतीतच बैलगाडीत त्यांनी मुलीला जन्म ( Girl Born In Bullock Cart ) दिला.या गावातील महिलांनी हिवाळ्यात, पावसाळ्यात सागाच्या पानांच्या छताखाली आणि गावाच्या हद्दीबाहेरील मोकळ्या मैदानात मुलांना जन्म दिला आहे.

जगण्या-मरण्याचा प्रश्न : गावातील महिलांची ही अवस्था पाहून श्याम कंवर सातवा महिना होताच भोपाळला गेले. त्यांच्या मनात प्रसूतीबाबत जीवन-मरणाचा प्रश्न होता. ही अंधश्रद्धा इतकी खोलवर आहे की, बीए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी पिंकीही तिच्या आजीप्रमाणेच ही परंपरा पाळते. गावात हा प्रकार घडल्याचे पिंकी सांगते. दहा वर्षांपूर्वीही गावात एका महिलेना बाळाला जन्म दिला मात्र बाळाकाचा मृत्यू झाला.

सरकारी योजनेचा लाभ नाही, रुग्णालय नाही : अंधश्रद्धेने गरोदर महिलांचा जीव धोक्यात टाकला ( No Govt Scheme In Sanka Shyam Village ) नाही. हे गाव अनेक सुविधांपासून वंचित आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे त्यांची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. या गावातील महिलांच्या आरोग्याची आव्हाने समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. येथील आरोग्य सेवा सुधारल्या पाहिजेत. गावात प्राथमिक आरोग्य केंद्रच नसल्याची परिस्थिती आहे.

योजनेपासून ग्रामस्थ वंचित : सुरक्षा योजनेसारख्या शासकीय सुविधांचा लाभ त्यांना अनेक वर्षांपासून मिळू शकला नाही. बहुतेक महिलांची प्रसूती रुग्णालयाऐवजी गावाबाहेर बांधलेल्या खोलीत किंवा मोकळ्या मैदानात झाली. या महिलांच्या नावाची मुलांच्या जन्माची सरकारी नोंदीमध्ये कुठेही नोंद नाही. राणीबाई सांगतात की, गावाबाहेरच्या खोलीत सरकारने सुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. मात्र काहीच झाले नाही.

गावात मूल जन्माला घालण्यावर बंदी का ? :येथे बांधलेले श्यामजींचे मंदिर एका रात्रीत बांधण्यात आल्याची सार्वजनिक अफवा आहे. जेव्हा हे मंदिर बांधले जात होते, त्याच वेळी एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि मंदिर अपूर्ण राहिले. तेव्हापासून या गावात मूल जन्माला बंदी असल्याचे सांगितले जाते. पुढे काही घरांमध्ये जन्माला आलेली मुले एकतर अपंग झाली किंवा जगलीच नाहीत, असा गावकऱ्यांचे म्हणणे ( Why Child Birth In Sanka Shyam Village Ban ) आहे.

प्रसूतीसाठी महिला दूरवर जातात :गावातील गोपाळ गुर्जर यांनीही आणखी एक कारण सांगितले ते सांगतात की हे मंदिर सहाव्या शतकातील आहे. आमचे वडील आणि आजोबा या मंदिरात पूजा करतात. मंदिराच्या पवित्रतेसाठी येथे कोणतीही महिला सुतक म्हणजेच बाळंतपणानंतरचा काळ घालवू नये, अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे. गावात हॉस्पिटलची सोय नसल्याचे त्यांचे म्हणणे ( No Hospital In Sanka Shyam Village) आहे. आताही पावसात पाणी तुंबते त्यामुळे महिलांना प्रसूतीसाठी दूरवर जावे लागते.

गाव अंधश्रद्धेने जखडले आहे : काळाचा वेग बघितला तर शहरांबरोबरच उभ्या असलेल्या खेड्यांमध्येही खूप काही बदलत आहे, समजुती बदलल्या आहेत, परंपरा बदलल्या आहेत, बदलाचा वारा सांका गावापर्यंत पोहोचला नाही असे नाही. . जगाच्या नवनवीन रंगांनी या गावानेही स्वतःला बदलून टाकले आहे, पण शतकानंतरही सांका गावाची ही रिती कायम आहे.

Last Updated : Nov 13, 2022, 8:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details