जमुई (बिहार) : बिहारमधील अनेक स्थलांतरित मजूर तामिळनाडूमध्ये राहतात आणि तेथेच काम करतात. त्यांना बरेचदा हिंदी भाषिक म्हणून त्रासही दिला जातो. आता बिहारमधील मजुरांना तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा वाईट वागणूक देण्यात आली आहे. यावरून राजकारणही तापले आहे. बिहार सरकारने घटनेच्या तपासाच्या सूचना दिल्या आहेत, तर तामिळनाडू प्रशासनाने सर्व उत्तर भारतीय पूर्णपणे सुरक्षित आहेत, घाबरण्याची गरज नाही, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बिहारमधील बरेच मजूर घरी परतले : बिहारमधील जमुईच्या बासबुट्टी गावात परतलेला प्रवासी मजूर राहुलने आपला अनुभव सांगताना म्हटले की, तो गेल्या 8 वर्षांपासून तामिळनाडू मध्ये राहत होता. तेथे तो एका लोखंड कंपनीत काम करत होता. त्याबदल्यात त्याला दररोज 650 रुपये मिळत होते. कमी - अधिक प्रमाणात अशाच प्रकारचे अनुभव तामिळनाडूहून परतलेल्या अजित राम, प्रमोद, बिरेंदर, कार्तिक, नितीश पासवान, विपिन पासवान आणि रोहित या मजुरांचेही आहेत. स्थलांतरित मजूर मुकेश पासवान सांगतो की, त्याने स्वत:च्या डोळ्यांनी बिहारींची मारहाण होताना पाहिली आहे. त्याच्या जीव धोक्यात असल्याने तो तेथून स्वत:च्या गावी परतला.
हिंदी भाषिक मजुरांचा निषेध :स्थलांतरित मजुरांनी सांगितले की, बिहारी मजुरांना कंपनीत काम मिळत असल्याने तमिळींना रोजगार मिळत नाही. त्यामुळे तमिळ लोक पूर्वीपासूनच हिंदी भाषिकांवर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी हिंदी भाषिक मजुरांचा विरोध सुरू केला आहे. तामिळनाडू मध्ये बहुतांश कंपन्यांमध्ये फक्त बिहारचे मजूर काम करत आहेत. दुसरीकडे, व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत माहिती विचारली असता, कामगारांनी कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही. ते म्हणाला की, कोणीतरी तर मेले आहे परंतू त्याला कोणी मारले आणि व्हिडिओचे सत्य काय आहे, ते माहित नाही. व्हिडिओ पाहून हे लोकही घाबरले आहेत.