लखनौ- कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( आरएसएस) चे सदस्य लॉकडाऊनचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ देत नाहीत. ते स्वतःच्याच घरांमध्ये कुटुंब शाखेचे आयोजन करत आहेत. यादरम्यान ते सामाजिक अंतरही ठेवत आहेत.
लॉकडाऊनदरम्यान करा 'कुटुंब शाखे'चे आयोजन, आरएसएसचा सल्ला
कुटुंब शाखेत कुटुंबातील सर्व नागरिक घराच्या छतावर किंवा अंगणात दररोज सकाळी एकत्र येतात. यानंतर योगा, व्यायाम आणि अध्यात्मिक शिक्षणाशी आधारित पुस्तके वाचत असल्याचे लखनऊमधील आरएसएसचे कार्यकर्ते डॉ. आर. एस. भटनागर यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, की सध्या अनेक कुटुंब या पद्धतीचा वापर करत आहेत.
कुटुंब शाखेत कुटुंबातील सर्व नागरिक घराच्या छतावर किंवा अंगणात दररोज सकाळी एकत्र येतात. यानंतर योगा, व्यायाम आणि अध्यात्मिक शिक्षणाशी आधारित पुस्तके वाचत असल्याचे लखनऊमधील आरएसएसचे कार्यकर्ते डॉ. आर. एस. भटनागर यांनी सांगितले. सध्या अनेक कुटुंब या पद्धतीचा वापर करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि लॉकडाऊनच्या परिणामांना सामोरे जाण्यास मदत होते. तसेच कुटुंबात सुसंवादही वाढतो, असे होमिओपॅथिक भटनागर यांनी म्हटले. लॉकडाऊनदरम्यान आरएसएस अनेक गरजूंना मदत करत आहे. यासोबतच सामाजिक अंतर राखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृतीही करत आहे.