महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 27, 2019, 12:09 PM IST

ETV Bharat / bharat

संधिसाधू सरकारची निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांवर कारवाई - राहुल गांधी

विरोधी पक्षातील नेते शरद पवार यांना विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने लक्ष्य केले आहे. यामधून भाजप सरकारचा संधीसाधूपणा आणि खुनशीपणा दिसून येतो, असे गांधी म्हणाले.

राहुल गांधी

नवी दिल्ली - विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सरकारकडून करण्यात येत असलेल्या ईडीच्या चौकशीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजप सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षातील नेते शरद पवारांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लक्ष्य केले आहे. यामधून भाजप सरकारचा संधीसाधूपणा आणि खुनशीपणा दिसून येतो, असे गांधी म्हणाले आहेत. ही टीका राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे गांधी म्हणाले.

राहुल गांधीनी केलेले ट्विट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, अजित पवार यांच्या नावाचा समावेश आहे. यानंतर संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सरकारद्वारे करण्यात येणारी ही कारवाई सुडबुदद्धीने करण्यात येत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

शरद पवार आज दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात जाणार असल्याने कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या परिसरात जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने माहिती दिली असून, कार्यकर्त्यांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून भाजप सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांची विविध प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम, डी. के. शिवकुमार, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही चौकशी सुरू आहे. भाजप सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांची चौकशी सुडबुद्धीने करत आहे, अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details