नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यातच काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांच्या ट्विटमुळे पायलट यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
"आणखी एका मित्राने काँग्रेस सोडली. सचिन आणि ज्योतिरादित्य हे चांगले सहकारी आणि मित्र होते. दुर्दैवाने पक्षाने दोन तरुण, आणि क्षमताशील नेत्यांना गमावले आहे. मला नाही वाटत त्यांचे महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे आहे, त्यांनी कठीण काळामध्ये पक्षासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती." अशा आशयाचे ट्विट प्रिया दत्त यांनी केले आहे.