महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 10, 2020, 12:44 PM IST

ETV Bharat / bharat

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणावर अनेकांचे प्रश्नचिन्ह; माध्यमांनाही रोखले होते

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव याबाबत म्हणाले, 'दरअसल ये कार नहीं पलटी है, राज़ खुलने से सरकार पलटने से बचाई गयी है', असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या, 'अपराधी का अंत हो गया, अपराध और उसको सरंक्षण देने वाले लोगों का क्या?' असे म्हणत यानंतर आता पुढे काय होणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

vikas dubey encounter
विकास दुबे एन्काऊंटर प्रकरण

कानपूर - कुख्यात गुंड विकास दुबेला आज सकाळी (शुक्रवारी) उज्जैन येथून कानपूर येथे आणण्यात येत असताना एसटीएफच्या (स्पेशल टास्क फोर्स) या गाडीला अपघात झाला. यावेळी गुंड विकास दुबेने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये तो ठार झाला. दुबेच्या एन्काऊंटरनंतर अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, विकास दुबेचे एन्काउंटर होण्याआधी पोलिसांनी एसटीएफ टीमला फॉलो करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना थांबवले होते. यावरुन देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव याबाबत म्हणाले, 'दरअसल ये कार नहीं पलटी है, राज़ खुलने से सरकार पलटने से बचाई गयी है', असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या, 'अपराधी का अंत हो गया, अपराध और उसको सरंक्षण देने वाले लोगों का क्या?' असे म्हणत यानंतर आता पुढे काय होणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग म्हणाले, अखेर ज्याची शक्यता होती ते झाले. विकास दुबेचे कोणकोणत्या राजकीय नेत्यांसोबत, पोलीस आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांसोबत संबंध होते, आता मात्र ते समोर येणार नाही. मागील 3-4 दिवसात विकासच्या 2 साथीदारांचेही एन्काऊंटर झाले. मात्र, या तिन्ही एन्काऊंटरचा पॅटर्न एक सारखा का आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच ते म्हणाले, विकास दुबेने आत्मसमर्पणासाठी मध्यप्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरालाच का निवडले? मध्यप्रदेशातील कोणत्या प्रभावी व्यक्तिच्या सहकार्याने तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊंटरपासून वाचायला इथे आला होता? याचे कारणे समोर येणे गरजेचे आहे.

एन्काऊंटर होण्याआधी माध्यमांना थांबवण्यात आले होते.

तर या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात उच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details