नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज मध्यरात्रीपासून २१ दिवस संपूर्ण भारत बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देश आता घरामध्ये बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून जर परिस्थिती आत्ताच नियंत्रणात आणली नाही तर अनर्थ ओढवेल, असा इशारा मोदींनी दिला आहे.
पुढील २१ दिवस जर आपल्याला परिस्थिती नियंत्रणात आणता आली नाही तर आपण २१ वर्षे मागे ढकलले जावू आणि हे सर्वांना लागू आहे. पंतप्रधानांना सुद्धा. नागरिकांना घरातून बाहेर निघण्यास पूर्णत: बंदी असेल. तीन आठवडे ही लक्ष्मण रेषा म्हणजेच घराचादरवाजा ओलांडू नका, असे मोदी म्हणाले.