नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजी) दिलबाग सिंग यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची शुक्रवारी भेट घेतली. यादरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना काश्मीरमधील सद्यस्थितीविषयी माहिती दिली. काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी झाल्याचे डीजी सिंह यांनी त्यांना सांगितले.
सध्या २०२० मधील पहिला दीड महिना संपत आला आहे. येथे २०१९ तुलनेत तितक्याच कालावधीतील दहशतवादी कारवाया ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे ते म्हणाले. तसेच, त्यांनी तांत्रिक आणि मानवी पातळीवरील पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आल्याचे सांगितले.